मुख्यमंत्री फेलोशिपच्या विद्यार्थ्यांनी साधला राज्यपालांशी संवाद

0
9

मुंबई, दि. 21 : मुख्यमंत्री फेलोशिप विद्यार्थ्यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची आज राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधत शासनाच्या विविध विभागात काम करीत असताना येणाऱ्या अनुभवाची आणि लोकोपयोगी योजनांची माहिती सांगितली.यावेळी राज्यपालांचे सचिव बी.वेणूगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान तसेच शासनाच्या विविध विभागात काम करणारे फेलोशिप विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आदिवासी भागात राबविली जात असलेली डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या फलश्रुतीची विशेष माहिती जाणून घेतली. तसेच विविध विभागात काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कामाचीही माहिती जाणून घेतली. यात कृषी, ग्रामविकास, मेट्रो, कोस्टल रोड या क्षेत्रातील माहितीही जाणून घेतली. तसेच पुढील कार्यास राज्यपाल यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.