पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वत:पासून करूया!

0
14

पर्यावरण दिन विशेष

जनजागृतीची गरज :भविष्यात भेडसावणार गंभीर समस्या

वडसा वन विभागात जंगलतोड थांबली

■ वडसा वन विभाग एकूण एक लाख ५१ हजार ३0५ हेक्टरवर पसरले आहे. वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य व नागरिकांना जंगलाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जंगलाची तोड होऊ नये म्हणून गॅसचे वितरणही करण्यात आले आहे. वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असल्याने जंगलतोडीच्या प्रमाणात लक्षणिय घट झाली आहे. तर दुसरीकडे जंगलात वन्य जीवांची संख्या वाढत चालली आहे. वन्य जीवांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वडसा वन विभागाने तयार केलेले जैवविविधता उद्यान. प्लास्टिक कचरा धोकादायक
■ शहरी कचर्‍यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिक कचर्‍याचे राहते. तयार झालेले प्लास्टिक पूर्णपणे कुजण्यास ५00 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. शहरामध्ये प्लास्टिकच्या कचर्‍याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा, यासाठी नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. गडचिरोली : वाढते औद्योगिकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण केवळ सरकारची जबाबदारी नसून भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे. आलापल्लीच्या जंगलातील सागवानाचे वृक्ष. दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे व पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाचे जीवन सुखी झाले. अनेक यंत्र मानवाच्या सुखासाठी सज्ज झाले. मात्र दुसर्‍या बाजुला या औद्योगिक क्रांतीची विषारी फळेही मानवाला पर्यावरणाचा र्‍हास झाल्यामुळे चाखायला मिळू लागली. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. राज्य शासनाने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हा विषय आवश्यक केला आहे. त्यामुळे जनजागृतीस मदत झाली आहे. कॉर्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले
■ वाढत्या जंगलाच्या र्‍हासामुळे वातावरणातील कॉर्बनडॉय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. याचे गंभीर परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला भोगावे लागत आहेत. कॉर्बनडॉय ऑक्साईडचे प्रमाण कमी करून ऑक्सीजनचे प्रमाण वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविणे हा एकमेव उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलावी. वन संरक्षणाचे लाभ नागरिकांना मिळाले
■ जंगलाच्या संरक्षणाचे लाभ जिल्ह्यातील नागरिकांना चाखायला मिळत आहेत. हजारो नागरिकांना वनपट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हक्काची जमीन उपलब्ध झाली आहे. वनोपज गोळा करण्याचे हक्क बहाल झाल्याने रोजगाराची समस्या सुटली आहे. याशिवाय वन विभागाने अगरबत्ती प्रकल्प, जैवविविधता प्रकल्प सुरू केल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा पर्यावरण संवर्धनाचा मार्गदर्शक
■ गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ७८ टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. येथील जनता मागील अनेक वर्षांपासून या जंगलाचे पोटच्या पोराप्रमाणे संरक्षण करीत आहे. गडचिरोलीत उद्योगांची संख्या नगण्य असल्याने पर्यावरण प्रदुषणाचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. गडचिरोली जिल्हा पर्यावरण संवर्धनाबाबत इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.