छत्तीसगड सरकार;दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत

0
13
वृत्तसंस्था
रायपूर, दि. २६ – दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून छत्तीसगड सरकारने ३०००० रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या मुख्यमंत्री कन्या विवाह योजणेच्या माध्यमातून देण्यात येणा-या निधीत वाढ करण्यात आली असून १५००० रुपयांवरुन ३०००० रुपये करण्यात आली आहे. हा निधी यंदाच्या दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मुलींच्या लग्नासाठी देण्यात येणार असल्याची माहिती एका सरकारी प्रवक्ताने दिली.
राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत हा निधी थेट दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान येत्या वर्षात या योजनेत सुधारणा करण्यात येणार असल्याचेही या प्रवक्ताने सांगितले.