पंतप्रधानांनी देवनार साफ करुन दाखवावे:राहुल

0
12
मुंबई – देवनार डंपिंग ग्राउंड हे अनेक नागरिकांच्या समस्यांचे मूळ कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवनार साफ करुन दाखवावे, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
 
मुंबईतील देवनार डंपिंग ग्राउंडला दिलेल्या भेटीत ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत अभियानावर टीका केली. देवनार डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.