आसामबाबतचा मोदींचा आरोप चुकीचा:मनमोहनसिंग

0
17

गुवाहाटी(पीटीआय) – आधीच्या पंतप्रधानांनी आसामसाठी काहीही केले नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज केला. आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या आज झालेल्या दुसऱ्या  टप्प्यातील मतदानावेळी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर डॉ. सिंग बोलत होते. 

गुवाहाटीतील दिसपूर सरकारी माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रात डॉ. सिंग यांनी मतदान केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी माझ्या कामाचे मूल्यमापन करावे, अशी माझी इच्छा नाही. माझ्या कार्यकाळात आसामसाठी मी काहीच केले नाही, असा आरोप मोदी करत आहेत. मात्र, हा आरोप खोटा आहे, हे मोदींना चांगले ठाऊक आहे. मागील पंधरा वर्षांत कॉंग्रेसने आसामसाठी केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय येथील नागरिक आमच्या पक्षाला देतील, असा मला विश्वास आहे.‘‘