विकासासाठी नगर पंचायत राष्ट्रवादीच्या हातात द्या

0
4

सडक-अर्जुनी दि.२३: लोकसभेत आणि विधानसभेत मतदारानी आम्हाला पाहिजे तसे यश दिले नाही. परंतु जिल्ह्याचे हाल आता काय आहेत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सर्वांगीन विकासासाठी सडक-अर्जुनीची नगर पंचायत राष्ट्रवादीच्या हातात द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले. सडक-अर्जुनीच्या शादीखान हॉलमध्ये ते मंगळवारी मार्गदर्शन करीत होते.

सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या निवडणुकीनिषयी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. याप्रसंगी आ.राजेंद्र जैन, प्रादेशिक प्रतिनिधी देवेंद्र चौबे, मनोहर चंद्रीकापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिनखेडे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, मिलन राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.अविनाश काशिवार, उपसभापती आनंद अग्रवाल, देवचंद तरोणे, खुटेजी मसराम, इसुफ पटेल उपस्थित होते.

नगर पंचायतच्या निवडणुका लक्षात घेवून खा.पटेल यांची ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना पटेल पुढे म्हणाले की, उच्छे दिनच्या नावावर आपली सर्वांची दिशाभूल करण्यात आली. तुरीची दाळ सामान्य लोकांना विकत घेणे कठीण झाले. धानाचे भाव वाढले नाही. ऊसाचे चुकारे मिळाले नाही, महागायीचा कळस गाठला गेला हेच का अच्छे दिन अशी टीका केली. प्रास्ताविक गंगाधर परशुरामकर यांनी मांडले. सडक-अर्जुनी तालुका निर्मितीमध्ये पटेल यांचेच योगदान असल्याचे सांगितले. निवडणूक संदर्भात यावेळी मनोहरराव चंद्रीकापुरे, युसुफ पटेल, खटूजी मसराम, मिलन राऊत, देवचंद तरोणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सडक-अर्जुनी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अविनाश काशीवार यांनी केले