नव्या लोकांना पक्षासोबत जोडा-हरिणखेडे

0
14

गोंदिया : /सामान्य नागरिकांच्या कामांसाठी कार्यकर्त्यांनी सक्रीयता दाखविण्याची गरज आहे. तसेच पक्षाच्या नवीन बूथ कमिटींचे गठन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या कार्य करावे. पक्ष मजूबूत करण्यासाठी पक्षासोबत जास्तीत जास्त नव्या लोकांना जोडण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी केले. पक्षाच्या कामठा, बिरसोला,बनाथर व फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय बैठकींत ते बोलत होते.
ग्राम कामठा येथे मनोज दहीकर, बनाथर येथे मनोहर दियेवार तर कारंजा येथे बंडूप्रसाद भांडारकर तर फुलचूर येथे उमेश पंजारे यांच्या निवासस्थानी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बैठकांना जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, गणेश बरडे, विनोद पटले, छगन माने, कीर्तीकुमार चव्हाण, विनायक खैरे, कुंदन कटारे, जितेश टेंभरे, मनोज दहिकर, उर्मिला रहमतकर, बेबी सिडाम, उषा बरडे, राजकुमार गजभिये, तेजराम वाघाडे, माधोराव आसोले, बलीराम पाटील, धनीराम पाथोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.