जिल्ह्यात बसपचे संघटन मजबुत करा-खा.विरसिंग

0
6

भंडारा दि.26-: बहुजन समाजाला न्याय हक्क मिळावा, यासाठी सत्तेची चाबी हातात असणे आवश्यक आहे. संघटना मजबूत झाल्यास सत्ता हस्तगत करणे दूर नाही त्यामुळे संघटना मजबुतीकरणासाठी तळागाळातील नागरिकांना हाताशी धरुन जोमाने कार्य करावे असे प्रतिपादन खासदार तथा बसपाचे राष्ट्रीय महासचिव अँड. वीरसिंग यांचे केले.
बहुजन समाज पक्ष जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र महेशकर, प्रदेश सचिव विश्‍वास राऊत, दिलीप मोटघरे, विरेंद्र बन्सोड, इंजि. संजय नासरे, जयराज मेo्राम, जिल्हाध्यक्ष इंजि. त्र्यंबक हरडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी नरेंद्र रामटेके, एन. जे. वानखेडे, डॉ. संघरत्ने, गिरीज गजभिये, दिवाकर लिमजे, मुकूंद चहांदे, कुंजन शेंडे, रोहित डहाट, चंद्रामणी गोंडाणे, इंजि. बी. धम्म, कृष्णा गजभिये, भैयालाल गजभिये, हेमंत शेंडे, हेमराज माटे, सुनिता गोंडाणे, संजू बांभोरे आदीनी सहकार्य केले