मध्य प्रदेशातील पुरात 15 जण मृत्युमुखी

0
8

वृत्तसंस्था
भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या वाढून मृतांचा आकडा आता 15 वर पोचला आहे, गेल्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत पुरामुळे सात जण मरण पावले, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे सात जण मरण पावले असल्याची माहिती काल मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

मुख्यमंत्री चौहान यांनी आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व 51 जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदतीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. शिबिरात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही या वेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.