घोषवाक्य लेखन स्पर्धेची जय्यत तय्यारी

0
27

अर्जुनी मोरगाव,दि.11ः- तालुक्यातील ग्रामपंचायत पवनी /धाबे येथे हागणदारी मुक्त गाव अधिक ODF ग्रामपंचायत कार्यक्रमाअंतर्गत घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ग्राम पवनी /धाबे इथं या घोष वाक्य लेखन स्पर्धेसाठी वाल पैंटिंग करणे सुरु झाले आहे.ही स्पर्धा 1 सप्टेंबर 2021 ते 15 आक्टोबर 21 पर्यंत सुरु राहणार आहे.
ही पेंटिंग 13 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावयाची आहे. यासाठी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, PHC आणि सार्वजनिक शौचालय यांच्या भिंतीवर ही पेंटिंग करावयाची असून PHC इथल्या भिंतीवर
1) स्वच्छता पाळा घराघरात-हेच औषध सर्व रोगात.
2) मायके मे रहो या ससुराल मे-जचकी कराओ अस्पताल मे
आदि म्हणींना प्रसिद्धी द्यावयाची आहे.गावातील जनतेला विनंती आहे की, त्यांनी सौचालायाचा वापर करून गाव स्वच्छ आणि रोगराई मुक्त ठेवण्यास ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच पपीता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते आणि सर्व सदस्यानी केली आहे.