राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सविंधान दिवस

0
10

मुंबई हल्ल्यातील शहिदांनाही वाहिली श्रध्दाजंली
गोंदिया,दि. २६  : येथील रेलटोली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याकरीता लिहिलेली स्वतंत्र राज्य घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाचे संविधान अर्पण केले होते. हे दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळण्यात येते.त्या निमित्त सविंधान दिवस कार्यक्रम आयोजित करुन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची माहिती देण्यात आली.तसेच मुंबई हल्यात शहिद झालेल्या शहिद पोलिसांना पक्षातर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे,भंडारा अर्बन बँक अध्यक्ष महेश जैन,माजी नगराध्यक्ष आशा पाटील,लता रहागंडाले,पी.एस.फुले,गोपाल तिवारी,वामन गेडाम,गुड़्ू बिसेन,प्रतिक भालेराव,गंगाराम कापसे,रवि मुदंडा ,नानू मुदलीयार,कृष्णकुमार जायस्वाल,अजाबराव रहागंडाले,अशोक शहारे आदी उपस्थित होते.