समस्या सोडविण्यास कटिबद्ध-ना.बडोले

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.14: प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मी कटिबद्ध आहे. सर्वांनी नि:संकोचपणे आपल्या समस्या मांडाव्यात, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते गोठणगाव येथील ग्राम सचिवालयामध्ये गुरूवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरणप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नारायण जमईवार, माजी सभापती उमाकांत ढेंगे, दामोदर कुंभरे उपस्थित होते.
तलावातील गाढ काढणे, पांदण रस्त्यावर मुरुम काम करणे, नवीन कार्डधारकांना रेशनचा माल उपलब्ध करुन देणे, पाणीपट्टीतील आकारणी ८0 रुपयांच्या ऐवजी प्रतिमहिना ६0 रुपये करणे, नळावरील विलंब आकार बंद करणे, गंधारी-जांभळी येथील पाण्याची समस्या सोडविणे, गॅसधारकांना एक लिटर मातीचे तेल मिळणे, रमाई योजनेचा लाभ एपीएल धारकांना मिळवून देणे आदी समस्या मांडल्या.
या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ना. बडोले यांनी आमने-सामने बोलावून संबंधित अधिकार्‍यांना निर्देश दिले. प्रास्ताविक जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी भावे यांनी केले.