पाण्यासाठी उपोषणावर बसलेले 4 शेतकरी रुग्णालयात

0
15
सतिश कोसरकर
नवेगावबांध,दि.09- गेल्या चार दिवसापासून नवेगावबांध जलाशयाच्या पाण्याला घेऊन सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकर्यांची परिस्थिती खालावली असून 15 पैकी 4 आंदोलनकर्ते शेतकर्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले.सोमवार  जिल्ह्याचे पालकमंत्री रा.सु.बडोले यांनी धावती भेट दिली परंतु आंदोलनकर्ते शेतकरी यांची समस्या निकाली न काढताच परत गेल्याने शेतकर्यांनी अधिक आंदोलन त्रीव केला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यामध्ये माधव पांडूरंग डोंगरवार,खूशाल धोंडू काशिवार,अमृत परसराम खुणे  व हिरामण गोपाळा कापगते यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी  पाण्याच्या न्याय हक्कासाठी उपोषनावर बसले आहेत.यांच्या आंदोलनाकडे सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीनेही तेवढेच दुर्लक्ष केले आहे.