चंद्रपूर ओबीसी कृती समितीने मागितला सामाजिक न्यायमंत्र्याचा राजीनामा

0
8

चंद्रपूर,दि.29-चंद्रपूर जिल्हा ओबीसी कृती समितीच्यावतीने आज मंगळवारला सामाजिक न्याय मंत्र्यानी ओबीसी समाजाची माफी मागावी तसेच मुख्यमत्र्यांनी त्याचा राजीनामा घ्यावा या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.निवेदनात सोमवारला  ओबीसी विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती, क्रिमिलेअरची अट,फ्री शिप आदी मागण्यासंबंधी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने सोमवारी सामाजिक न्याय भवन परिसरात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी झालेल्या घोषणाबाजीनंतर मंत्री राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाच्याविरोधात अपशब्द काढल्याने 52 टक्के ओबीसी समाजाचा अपमान झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी कृती समितीचे सयोंजक सचिन राजुरकर,बबनराव फंड,सुर्यभान झाडे,राहुल बेले,हिराचंद बोरकुटे,राहुल पावडे,बंडु देठे,हितेश चव्हाण,सुनिल लांजेवार आदी उपस्थित होते.