रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

0
8

नागपूर, दि. ३० : नागपूर-जबलपूर मार्गावरील नेरी गावानजीक भरधाव वेगात चुकीच्या दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रकने बुधवारी सकाळी चौघांना उडविले. त्यात आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू झाला. देवलबाई रणछोडदास साठे (६०), काजल रण्णू साठे (७), रामू रण्णू साठे (३) आणि जया रण्णू साठे (१) मृतांची नावे आहेत. ट्रकमध्ये नेरी रेतीघाटातून रेती भरून चालकाचे नाव अशोक उत्तम शेंडे (२९) कामठीकडे येत होता. नागपूर-जबलपूर बाह्यवळण मार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडलगत राँग साईडने शेंडेने ट्रक भरधाव नेला. त्याचवेळी समोरून मोटरसायकलवरून एक तरुण येत असल्याचे दिसताच त्याने ट्रक बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक शेतात गेला. तेथे वृद्ध महिलेसह तीन बालकांना धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.