पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा- खा.नाना पटोले

0
7

 

 

गोंदिया – शेतकèयांना नेहमी नैसर्गिक आपत्ती आणि कृषी मालाच्या बाजारभावाची काळजी असते. शेतकèयांसाठी फायद्याची अशी पंतप्रधान पीक विमा योजना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकèयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विज्ञान केंद्र हिवरा व कृषी विभाग गोंदिया यांच्या संयुक्त वतीने पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा.पटोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी नागपूरचे अजय पांडे, देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, गोंदियाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री.नयनवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर प्रामुख्याने उपस्थित होते.
खा.पटोले पुढे म्हणाले, पीक विम्यावर सरकारने दिलेले आजवरचे हे सर्वाधिक अर्थसाहाय्य आहे. यामध्ये शेतकèयांसाठी विम्याचा दर फार कमी असून उर्वरित रकमेचा ९० टक्के बोजा शासन उचलणार आहे. खाद्यान्न, डाळी आणि तेलबियांसाठी विम्याचा दर एक हंगाम एक दर असेल. खरिपासाठी २ टक्के व रब्बीसाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा शेतकèयांनी भरावयाचा विमा हप्ता स्थानिक आपत्तीच्या प्रसंगामध्ये पूरस्थिती व जलसंचय समाविष्ट करण्यात आले आहे. सुगीपश्चात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान देखील या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे.उत्पन्नाचा अचूक अंदाज आणि विम्याचे दावे वेगाने निकाली काढण्यासाठी मोबाईल आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा ही योजना पुढील खरीप २०१६ हंगामापासून लागू करण्यात येईल.
पंतप्रधान पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी तसेच केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या दहा खासगी विमा कंपनीच्या साहाय्याने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकèयांनी पीक विमा काढलाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वय डॉ.एस.एम.नवलाखे यांनी केले. संचालन कृषी विज्ञानकेंद्राचे सहायक प्राध्यापक आर.पी.मांडवे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एच.एस.चव्हाण यांनी मानले.