रेल्वे विभागाने शेतकèयांना जमीनीचा योग्य तो मोबदला द्यावा : संजय टेंभरे

0
9
– रेल्वे विभागाच्या टॉवर लाईन प्रकरण
– रेल्वे विभागाची दबंगशाहीने शेतकरी त्रस्त
तभा वृत्तसेवा
गोंदिया, ३ मे
रेल्वे विभागाच्या वतीने मुंडीपार ते हिरडामाली दरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकèयांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कोणताही जमिनीचा मोबदला न देता टॉवर उभारणे सुरू आहे. त्यामुळे शेतकèयांना आर्थिक नुकसान होत असल्याचे या प्रकरणी शेतकरी नेते संजय टेंभरे यांनी रेल्वे विभागाने शेतकèयांना जमिनीचा योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी रेल्वे अधिकाèयांशी झालेल्या चर्चेदरम्यान केली. दरम्यान रेल्वे विभागाने सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलनात्मक पवित्राचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रेल्वे विभागाच्या वतीने गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनकरिता विद्युत पुरवठा करण्यासाठी हिरडामाली येथे विद्युत साठवण केंद्र क्रियान्वित करण्यात आले असून यासाठी गोंदियाच्या एमआयडीसी क्षेत्रातील मुंडीपार येथून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने मुंडीपार ते हिरडामाली दरम्यान तुजलाराम दिहारी (चुटीया), भाऊराम फाये, बुधा भगत, शामलाल बघेले सर्व लोधीटोला, प्रल्हाद चैतराम हरिणखेडे (गणखैरा), ओंकार पारधी (पुरगाव), गजानन रहांगडाले, राजकुमार रहांगडाले, चदंन पंधरे, रेखा ठाकरे, मनिराम कटरे, नान्हू बागडे सर्व रा. qचचगाव तसेच डिगेंद्र तिलकचंद रहांगडाले (पुरगाव), या शेतèयांच्या शेतात टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. टॉवरचे बांधकाम करताना एक दोन शेतकèयांना पीक नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले असते तरी अनेक शेतकèयांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे टॉवरचे बांधकाम होत असताना वडिलोपर्जित असलेली जमिन निरूपयोगी होत असल्याने बाजारभावानुसार शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी शेतèयांची मागणी होती. यासंदर्भात चुटिया व लोधीटोला परिसरातील शेतकèयांनी या विद्युत टॉवरच्या बांधकामाला विरोध दर्शवून बांधकाम थांबविले आहे. यासंदर्भात शेतकरी नेते संजय टेंभरे यांच्या नेतृत्वात रतन बघेले, उत्तम भगत यांच्यासह परिसरातील शेतकèयांनी नागपूर येथील रेल्वे विभागाच्या कार्यालयात डीईई दीनानाथ व डीसी ठाकूर यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. मात्र रेल्वे विभागाच्या वतीने फक्त पीक नुकसान भरपाई देण्यात येणार इतर कोणतीही मदत देता येणार नसल्याचे अधिकाèयांनी सांगताच संजय टेंभरे यांनी शेतकèयांना जोपर्यंत त्यांचा जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देणार नाही तोपर्यंत टॉवरचे बांधकाम सुरू होवू देणार नसल्याचे सांगून आंदोलनात्मक पवित्रा घेवून शेतकèयांना न्याय देणार असल्याचे सांगितले.