कोणीही विदर्भवाद्यांवर हात उगारला, तर सहन करणार नाही

0
6

वर्धा : गांधीजींच्या विचाराने वेगळ्या विदर्भाची लढाई ही चालवली जाईल. पण जर कोणीही विदर्भवाद्यांवर हात उगारला, तर आम्ही गांधींजींनी सांगितल्याप्रमाणे दुसरा गाल पुढे करणार नाही. आम्ही सहन करणार नाही, असा इशारा श्रीहरी अणेंनी वर्ध्यात दिला. काल विदर्भाची दशा आणि दिशा यावर वर्धा जिल्ह्यातील आर्वीत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदारांची पगारवाढ आणि विदर्भातील शेतकरी यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. अणे म्हणाले, हे सरकार म्हणजे दुसरं सावकार आहे. एकीकडे शेतकरी मारतो आहे, अशा परिस्थिती असताना आमदारांनी पगारवाढ करुन घेतली. पगार वाढवणारे सरकार आमदार ज्यांनी ही वाढ स्वीकारली आहे, ही बाब लांच्छनास्पद आहे, असेही श्रीहरी अणे म्हणाले.