लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका ओपिनियन मेकर्सची – अश्विन मुद्गल

0
716

उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून अनिल गडेकर यांचा सन्मान
नागपूर,दि.२3 : लोकशाहीत प्रसारमाध्यमांची भूमिका ओपिनियन मेकर्स- ‘मत निर्मात्याचीङ्क असते. आधुनिक काळात संदेशवहन विद्युत गतीने होत असल्याने जनसंपर्क अधिकाèयांची कार्यपद्धतीही बदलत आहे. प्रसारमाध्यमसंदर्भात काम करतांना सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारुन सुवर्णमध्य साधणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले.
राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे प्रेस क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पी.आर.एस.आय.चे अध्यक्ष सत्येंद्र प्रसाद सिंग, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते उपस्थित होते.
भारतीय संविधानाची प्रस्तावना ही एक प्रकारचा संकल्प पत्र असून राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त ङ्क एक राष्ट्र, एक आवाज, एक संकल्प ङ्क या विषयाला ती समर्पक ठरते, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी प्रतिपादन केले.
देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी, लोकशाहीची मुल्ये जोपासल्या जावी, याकरिता शासन प्रयत्नशील आहे. अशा पाश्र्वभूमीवर राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देत एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर हि भूमिका नक्कीच दिशा देणारी ठरते आणि लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना व आदर निर्माण करण्याचे काम जनसंपर्क अधिकारी आणि माध्यमे प्रभावीपणे करू शकतात त्याकरीता त्यांनी ‘ओपिनियन मेकर‘ बनून समाजमन तयार करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
सद्य:स्थितीत ज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल झाला असून संवाद प्रचंड गतिमानतेने होत आहे. त्यामुळे एकीकडे कायद्याची चौकट आणि दुसरीकडे सोशल मीडिया समाजमनावर सातत्याने आघात करीत आहे. अश्या पाश्र्वभूमीवर ज्याप्रमाणे शक्तिशाली विचार पुढे येऊन फ्रेंच क्रांती झाली तीच ताकद आपल्या संविधानात आहे. संविधानातील उद्देशिकेत सांगितल्याप्रमाणे राष्ट्राची एकता, अखंडता आणि बंधुता वाढविण्यासाठी प्रत्येकाला दृढसंकल्प स्वीकारून तसे वागावे लागेल व लोकशाहीला अधिक मजबूत करावे लागेल, असेही प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे हस्ते बेस्ट पी.आर.ओ. म्हणून अनिल गडेकर यांचा शाल, श्रीफळ ,तुळशी रोप व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अनिल गडेकर म्हणाले की बदलत्या काळात जनसंपर्क अधिकाèयांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. शासन व माध्यमे यामध्ये दुवा म्हणून काम करावे लागते. याप्रसंगी सेवाकाळातील अनुभव, मार्मिक प्रसंग त्यांनी उदाहरणासह सांगितले.
माहिती अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतांना प्रसंगावधान राखून घटनेचे महत्व ओळखून संबंधित माहिती प्रसारमाध्यमांना देणे आवश्यक असते. अधिकाèयांनी केवळ शासकीय योजनांची माहिती देणेच अपेक्षित नसते तर सर्वांगीण दृष्टीकोन बाळगणे आवश्यक असते, असे मत यावेळी त्यांनी मांडले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्हा प्रशासनासोबत कार्य करतांना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचा नोडल अधिकारी या नात्याने प्रसारमाध्यमाविषयीचे महत्वाचे निर्णय जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने घेतले जातात. यात इतर प्रसारमाध्यम तज्ज्ञाचांही समावेश असतो, अशी माहिती अनिल गडेकर यांनी दिली.
जनसंपर्क अधिकारी हा संस्थेचा आरसा असतो व संस्थेप्रती जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम तो करीत असतो. देशातील सध्याच्या परिस्थितीचा वेध घेत एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर हा महत्वपूर्ण विषय पब्लिक रिलेशन्स सोसायटीने जनसंपर्क दिनाच्या निमित्ताने पुढे आणला असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष भाषणात प्रदीप मैत्र यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकातून सत्येंद्र प्रसाद सिंग यांनी पब्लिक रिलेशन्स सोसायटीच्या कार्यावर प्रकाश टाकला व राष्ट्रीय हिताकरिता जनसंपर्क अधिका?्यांचा असलेला खारीचा वाटा याबद्दल त्यांनी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन नागपूर मेटड्ढोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी तर आभार प्रदर्शन यशवंत मोहिते यांनी केले. पी.आर.एस.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजित पाठक यांचा शुभेच्छा संदेशाचे वाचन व अनिल गडेकरांचा परिचय आकाशवाणीच्या सहाय्यक संचालिका गौरी मराठे यांनी केला.कार्यक्रमाला नागपुरातील कॉर्पोरेट, शासकीय, खाजगी संस्थांमधील जनसंपर्क अधिकारी, निवृत्त अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, पी.आर.एस.आय.चे पदाधिकारी व सदस्य तसेच प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.