खा.पटोलेंची वेगळ्या विदर्भाची लोकसभेत मागणी

0
7

नवी दिल्ली,दि.7-गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी तेथील जनता करीत आहे.महाराष्ट्रात राहून अद्यापही विकास झालेला नाही.काँग्रेसप्रणीत आघाडीच्या सरकारने विदर्भाचा विकासच हिरावून घेतला असून जनतेच्या हितासाठी केंद्रसरकारने वेगळा विदर्भ राज्य निमार्ण करावे अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत केली.ते आज गुरुवारी लोकसभेत प्रश्नाेतराच्या चर्चेच्यावेळी बोलत होते.विदर्भ खनिजसंपन्न,विजेच्या उत्पादनाचे केंद्र असल्याने हे राज्य म्हणून वेगळे झाले तर महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी लवकरच विकास होऊ शकतो यासाठी केंद्रसरकारने वेगळ्या विदर्भ राज्याबाबत आपले धोरण स्पष्ट करावे अशी मागणी केली.