40.3 C
Gondiā
Sunday, May 18, 2025
Home Blog Page 5684

‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील

0

वृत्तसंस्था
मुंबई दि.29- संसदेने मंजूर केलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला महाराष्ट्रातूनही संमती देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आज (साेमवारी) सुरुवात झाले आहे. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याची केवळ अाैपचारिकता बाकी असून, शिवसेनेने विधेयकाला सशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्‍यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध करणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

ज्‍या मोदींनी जीएसटीला विरोध केला, तेच त्‍या बाबत आज आग्रही : धनंजय मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्‍हणाले, ”काळाचा महिमा कसा असतो, ज्या मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीला विरोध केला, तेच देशाचे पंतप्रधान झाल्यावर जीएसटी बाबत आग्रही आहेत. राज्याच्या हिताला प्राधान्‍य देण्‍यासाठी जीएसटीला आमचा पाठिंबा असेल”, असेही म्‍हणाले.

कॉंग्रेसने श्रेय लाटू नये : राधाकृष्ण विखे पाटील
काँग्रेस पक्षच जीएसटीचा जनक काँग्रेस पक्षच आहे, त्यामुळे भाजपने या विधेयकाचे श्रेय लाटू नये, अशा शब्‍दांत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.
जीएसटी विधेयक आणून आपण नवीन काहीतरी करतोय, असे भासवण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना 2010 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीएसटीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे भाजपने या विधेयकाचे श्रेय लाटू नये’, अशी तोफ विखेंनी डागली.

मुनगंटीवार यांनी केले विधेयक सादर
राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटी विधेयक विधानसभेत सादर केले. यावेळी ते म्‍हणाले, ”भ्रष्टाचार संपवण्यासाठी GST महत्‍त्‍वाचे आहे. सध्‍या जी जीवघेणी स्‍पर्धा पाहायला मिळते ती GSTमुळे कमी होईल. शिवाय करप्रणालीत सूसुत्रता येण्यासाठी जीएसटी महत्त्वाचे आहे, असे ते म्‍हणाले. तसेच जीएसटीमुळे राज्य आणि मुंबई महापालिकेच्या अधिकारांवर कोणतीही गदा येणार नाही, असे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले. जीएसटी समितीत राज्यांच्या प्रतिनिधींची संख्या जास्त असल्यामुळे राज्यांना डावलणे अशक्य आहे. तसेच मुंबईच्या हिताची जबाबदारी माझी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
नेमके का बोलावले अधिवेशेन ? जीटीएस विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदार उपस्थित होते.या विधेयकाबाबत काही गोष्टींबाबत सरकारकडून उत्तरं घेणार असून काँग्रेस या विधेयकाला विरोध करणार नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २९ – रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजीव गांधी खेल रत्न हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. राष्ट्रपती भवनात सुरु असलेल्या या कार्यक्रमात खेल रत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरला राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.

खेलरत्न पुरस्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवणा-या साक्षी मलिकला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
नेमबाज जीतू रायला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
रिओ ऑलिम्पिकमध्ये वॉल्ट जिमनॅस्टीक्स प्रकारात चौथे स्थान मिळवणा-या दीपा कर्माकरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.

अर्जुन पुरस्कार
टेबलटेनिसपटू सौम्यजित घोष अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
महिला नेमबाज अपूर्वी चंदेला अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
नेमबाज गुरप्रीत सिंग अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
भारतीय हॉकीपटू रघुनाथ वोक्कालिगा अर्जुन पुरस्कारने सन्मानित.
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालला अर्जुन पुरस्कार प्रदान.
फुटबॉलमध्ये सुब्रतो पॉललआ अर्जुन पुरस्कार प्रदान.
बॉक्सर शिव थापाला अर्जुन पुरस्कार प्रदान.
बिलियडर्स, स्नूकरसाठी सौरव कोठारीला अर्जुन पुरस्कार प्रदान.
धावपटू ललिता बाबरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते २०१६ साठीचा अर्जुन पुरस्कार प्रदान.
रजत चौहानला अर्जुन पुरस्कार प्रदान.

द्रोणाचार्य पुरस्कार
कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित.
भारतीय जलतरण संघाचे प्रशिक्षक प्रदीप कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार.
विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
नागापुरी रमेश यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीच्या द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.

युवा स्वाभीमानच्या दहिहंडीला सैराट च्या टीमने लावले वेड

0

अमरावती,दि.29-संपूर्ण मराठी चित्रपट श्रुष्टीत मराठी माणसाला याड लावणारी सैराट टीम अमरावती येथील आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमानने आयोजित केलेल्या दहिहंडी स्पर्धेत हजेरी लावली, सर्व तरुणांची आवडते आर्ची, परशा, लंगड्या आणि सल्याला पाहण्यासाठी तरुणांनी अलोट गर्दी केली होती.
अमरावती येथील स्थानिक राजापेठ येथे दरवर्षी आमदार रवि राणा यांची युवा स्वाभिमान द्वारा विदर्भ स्तरीय दहीहंडीचे आयोजन केल्या जाते. यावर्षी सैराट टीम येणार असल्याने नागरिकांनी व महाविद्यालयीन तरुणांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केलि होती. सैराट टीम स्टेजवर येताच डीजेच्या तालावर “झाल झिंग झिंग झिंगाट” गाण लागताच तरुणांनी व सैराट टीमने एकच ताल धरला.तरुणांसोबत संवाद साधताना सैराट चित्रपटातील प्रसिद्ध “काय बघतोय रे….” हा डायलॉग आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांनी त्यांच्या ख़ास शैलितुन सादर केला. यावेळी अंबा नागरीतील तरुण तरुणी सैराट पहायला मिळाले.
लाखो रुपयांच्या अनेक बक्षीसा सोबत हा सोहळा पार पडला. यावेळी आमदार रवि राणा यांच्या सुपुत्रीचा नामकरण विधि सर्व धर्मीय धर्मगुरुच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रणवीर रवि राणा असे नामकरण करण्यात आले.aसोबतच आपली राजापेठ येथील दहिहंडी स्वतंत्र विदर्भाला समर्पित आहे असे यावेळी रवि राणा यानी घोषित केले.यावेळी लाखो च्या वर जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी आमदार रवि राणा, नवनीत राणा, चंद्रकुमार जाजोदिया, विनोद गुहे, नगर सेवक विजय नागपुर, सुनील काळे या सह अनेक नागरिक उपास्थि होते.

रायुकाँने सोपा पीडब्लूडी के कार्य.अभियंता निवेदन

0

गोंदिया,दि.29- गोंदया शहर के लिय बडे जद्दोजेहद के बाद एंव एक नेता का मकान बचाने के लिये ओवरब्रिज का नक्शा बदलने के बाद जनता के लिये दो वर्ष पुर्व सुरु किये नए उड़ान पुल (ओवररब्रिज़) पर बरसात के दिन मे ही नही तो आम दिन मे भी सर्वसाधारण बारीश होने पर पाणी जमा होता। वह पाणी जब वाहन गुजरते है तब निचे उडकर आता है उस जमा होने वाले पानी की निकासी व्यवस्था की सुचारु करने हेतु एव ब्रिज के बंद स्ट्रीट लाइट शुरू करने हेतु राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने दिया पीडब्लूडी के कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण को निवेदन सोपकर दुरुस्ती की मांग की है। राष्ट्रवादी युव काँग्रेस के रौनक ठाकूर,संजिव राय(बिहारी) इनके नेतृत्व के शिष्टमंडल ने श्रीमती चव्हाण से मुलाकात कर समस्या अवगत करायी।
बरसात आने पर नए उड़ान पुल पर सारा पानी जमा हो जाता है । इससे नए उड़ान पुल के निचे से गुजरने वाले नागरिको के ऊपर वह सारा गन्दा पानी का सामना करना पड़ता है । वहा जमा पानी की निकासी की व्यवस्था जल्द से जल्दी हो इसी मांग को लेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस गोंदिया ने दिया ज्ञापन कार्यकारी अभियंता ने दिया 7 दिनों के भीतर व्यवस्था सुधारने का आश्वासन शिष्टमंडल को दिया है।

ओबीसी युवक युवतींना लढा द्यावा लागेल-प्रा.रमेश पिसे

0

नागपूर,दि.29: मंडल आयोगानुसार मिळालेल्या सोयीसवलती पदरात पाडून घ्यायच्या असतील तर ओबीसी युवक-युवतींना संघटितपणे रचनात्मक लढा द्यावा लागेल, असे आवाहन कमला नेहरू महाविद्यालयाचे प्रा. रमेश पिसे यांनी केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने काँग्रेसनगर येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात एकदिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन रविवारला(दि.28) करण्यात आले होते.
यावेळी प्रा. पिसे बोलत होते. दरम्यान, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.शेषराव ङ्मेलेकर, मनोज चव्हाण, सुषमा भड, मंगेश कामुने, गजानन धांडे उपस्थित होते. यावेळी ओबीसींचे संविधानिक अधिकार, नॉन क्रिमिलेअर, भारत सरकार शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिपूर्ती योजना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. पिसे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आणि अवघ्या देशात ओबीसी समाज मोठ्या संख्येनी आहे. असे असतानाही ओबीसींच्या हक्काकडे कायम दुर्लक्ष केल्या जात आहे. याचा परिणाम म्हणून ओबीसी विद्याथ्र्यांना शिक्षणात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ओबीसी विद्याथ्र्यांची परिस्थिती हलाखीची असतानाही अपुèया शिष्यवृत्तीअभावी ते शिक्षणापासून वंचित राहतात. आज नोकèयांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात येत असले तरी ते तोकडे आहे. या सर्व मागण्या पूर्ण करायच्या असतील तर युवा वर्गाने संघटित होण्याची गरज आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा उभारण्याची गरज असून युवा वर्गावर ही जबाबदारी आहे, असेही पिसे म्हणाले.
ङ्मावेळी प्रा.येलेकर ङ्मांनी क्रिमिलीअर संदर्भात माहिती देताना सांगितले की, शासन प्रशासनातील अधिकारी हे अधिकारी कर्‘चाèङ्मांचे पाल्ङ्म जेव्हा क्रिमिलीअर सर्टिफिकेट बनविण्यासाठी जातात तेव्हा त्यांना वेतनामुळे उत्पन्न अधिक होते हे सांगून नान क्रिमिलीअर प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करतात. जेव्हा की, पगार व शेतीपासूनचे मिळणारे उत्पन्न सोडून इतर उत्पन्न आधारे नान क्रिमिलीअर प्रमाणपत्र दङ्मावङ्माचे असते. परंतु शासन निर्णङ्माच्ङ्मा अपुèया माहितीमुळे ओबीसींना डावलले जात असल्ङ्माचेही म्हणाले. नॉन क्रिमिअरची मर्यादा ही केंद्राच्या क्रिमिलेअरच्या मर्यादेत असाङ्मला पाहिजे जेणेकरुन शिष्यवृत्ती व फि्शिपचा लाभ विद्याथ्ङ्याना घेता येईल. परंतु राज्य सरकारने फ्रिशीपचा लाभ देतांना अट घालून ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसींच्ङ्मा विकासासाठी मंडल आङ्मोगाची संपूर्ण अंमलबजावणी होणे आवश्ङ्मक आहे. सोबतच नच्चीपण आयोगाच्या शिफारशी सरकारने लागू केल्ङ्मास ओबीसी समाज विकासाच्या प्रवाहात ङ्मेऊ शकतो. व्ही.पी. सिंग यांनी मंडल आङ्मोगाची एकच शिफारस लागू केली. तेव्हा हा समाज एवढा जागृत झाला. संपूर्ण मंडल आयोगाच लागू झाला असता तर हा समाज विकासात अग्रस्थानी राहिली असता. ङ्मा समाजाच्या विकासासाठी ओबीसींना लोकसभा व विधान सभेतही प्रतिनिधीत्व करण्यासाठी राखीव जागा देणे गरजेचे झाले आहे.
कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. तायवाडे यांनी ओबीसींच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याची गरज असल्याचे सांगत या कार्यशाळेच्या माध्यमातून ओबीसी विद्याथ्र्यांच्या प्रश्नांविषयी माहिती प्राप्त करून घेण्यात यावी जेणेकरून भविष्यात कुठलीही समस्या निर्माण होणार नाही, असे नमूद केले. तसेच येत्या काळात ओबीसी महिलांचे हक्क, अधिकार आदी विषयावर एक दिवसीय ओबीसी महिला मेळावा आयोजित करुन महिलांना जागृत करण्यात येणार असल्याचेही सांगितले. प्रास्ताविक डॉ. गजानन धांडे यांनी केले. संचालन निकेश पिणे ङ्मांनी केले.कार्यशाळेला सचिन राजुरकर, गुणेश्वर आरीकर, खेमेंद्र कटरे, गोपाल सेलोकर, शुभांगी मेश्राम, अशोक गवाणकर, नरेश्चंद्र काठोडे, संकल्प धावडे, पांडुरंग काकडे, शरद वानखेडे, गोविंद वरवाडे, गंगाधर कुनघाटकर, विनोद उलीपवार, नाना लोखंडे, शामल चन्ने, उज्वला महल्ले, मृणाल यांच्यासह विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

रेडिओलॉजिस्ट १ सप्टेंबरपासून संपावर

0

मुंबई, दि. 28 – सरकार दरबारी रेडिओलॉजिस्टच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्यामुळे न्याय मिळवण्यासाठी देशभरातील रेडिओलॉजिस्टनी संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होणार असून, संपामुळे अनेक रुग्ण उपचाराविना राहण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. येत्या १ सप्टेंबरपासून देशासह राज्यातील २ हजार रेडिओलॉजिस्ट बेमुदत संप पुकारणार असल्याची माहिती इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक (पीएनडीटी) डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले.

अ‍ॅट्रॉसिटीमध्ये दुरुस्ती करावी लागेल- शरद पवार

0

औरंगाबाद, दि. 28 – कोपर्डी घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जिथे आवश्यक आहे, त्या ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कोपर्डी घटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत आणि या मोर्चांमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी होत आहे, यासंदर्भात विचारले असता खा. पवार यांनी वरील उत्तर दिले. गेल्या काही दिवसांत अत्याचाराच्या तीन चार घटना घडल्या. त्या दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. या अन्याय अत्याचाराविरुध्द प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या परिणामाचाही विचार करावा लागेल. त्यामुळे या कायद्यात जिथे दुरुस्ती शक्य असेल तिथे ती करावी लागेल, असे ते म्हणाले.
अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांचे एटीएस (अँटी टेररिझम स्वॉड)ने ह्यइसिसह्णच्या नावाखाली अटकसत्र चालविले असून एटीएस कडून अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप खा. शरद पवार यांनी यावेळी केला.यापूर्वी मालेगाव प्रकरणात आरोपी असलेले मुस्लिम समाजाचे तरुण नंतर आरोपातून मुक्त झाले. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकारने या प्रकरणात निष्पक्षपातीपणे काम करणारे अधिकारी नेमावेत असे खा. पवार म्हणाले.

भारतातील आपत्ती व्यवस्थापन दुबळे

0

पायाभूत सुविधांचा अभाव- जागतिक स्तरावरील सर्व्हेक्षणातील निकष

नागपूर-नैसर्गिक संकटांच्या काळात मूलभूत सुविधांचे गांभीर्य आणि कमकुवत वाहतूक व्यवस्थेमुळे आपत्तीचे धोके अधिकच वाढत आहेत. ते टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे गरजेचे आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारताचे आपत्ती व्यवस्थापन दुबळे असल्याचे जागतिक पातळीवरील एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. भविष्यात त्यात सुधारणा न झाल्यास नैसर्गिक संकटांसह इतरही संकटांना भारताला सामोरे जावे लागेल, असा धोक्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाच्या जागतिक अहवालात देण्यात आला आहे.
‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ुट फॉर एन्व्हायर्नमेंट अँड ह्य़ुमन सिक्युरिटी’ आणि ‘बन्डनीस एन्ट्विक्लंग हिफ्ट इन कार्पोरेशन’ (युएनयू-इएचएस) ने जर्मनीतील स्टुटगार्ट विद्यापीठाच्या सहकार्याने जागतिक धोका निर्देशांक अहवाल-२०१६ गुरुवार, २५ ऑगस्टला प्रकाशित केला. जगातील १७१ देशांमध्ये नैसर्गिक अडथळे आणि सामाजिक असुरक्षिततेच्या एकत्रित विश्लेषणाच्या माध्यमातून आपत्तीच्या जोखमीचे मूल्यमापन करण्यात आले. यात भारत ७७ व्या, तर पाकिस्तान ७२ व्या क्रमांकावर आहे. आपत्तीची जोखीम अधिक असणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशाचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये आहे.

प्रवाशांनी प्राणभयाने मारल्या बसबाहेर उड्या…

0

भोपाळ(वृत्तसंस्था) – जबलपूर येथील विमानतळावर बसने प्रवास करत असलेल्या 30 प्रवाशांनी एअर इंडिया कंपनीचे विमान बसच्या अचानक खूप जवळ आल्याने प्राणभयाने बसबाहेर उड्या मारल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. सुदैवाने या विमानाचा पंख बसला न धडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या पार्श्‍वभूमीवर, एअर इंडियास हवाई प्रवास नियमन संस्थेकडून इशारा देण्यात आला आहे.

हे विमान प्रशिक्षित कर्मचाऱ्याच्या मदतीने “पार्क‘ न करता एका मदतनीसाकरवी पार्क करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही या पार्श्‍वभूमीवर निष्पन्न झाले आहे. जबलपूरच्या दुमना विमानतळावर अलायन्स एअर (एअर इंडिया) कंपनीचे विमान नियोजित वेळेआधीच 15 मिनिटे उतरल्यानंतर विमानतळावरील “पार्किंग बे‘च्या दिशेने येत होते. याचवेळी, स्पाईसजेट कंपनीच्या विमानामधून उतरलेले प्रवासी बसमधून टर्मिनलकडे येत होते. या बसच्या दिशेने विमान धोकादायक पद्धतीने येत असल्याचे पाहून बसमधील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा विमानाच्या कप्तानाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. बसमधील प्रवाशांनी या प्रकारानंतर बसबाहेर उड्या मारल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी स्पाईस जेटकडून औपचारिक तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, विमान व बसमध्ये सुरक्षित अंतर असल्याचा दावा एअर इंडियाकडून करण्यात आला आहे.

माझा मुलगा मुकेशचा मृत्यू नव्हे तर हत्याच-देवनाथ रहागंडाले

0

गोंदिया पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन,सीआयडी मार्फेत व्हावी चौकशी
शिष्टमंडळात क्षत्रिय पवार महासभेसह,पोवार संघटनांचा सहभाग

गोंदिया,berartimes.com ,दि.27- सडक अर्जुनी येथील प्रतिष्ठित वकील म्हणून परिचित असलेले आणि गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले अॅड मुकेश रहागंडाले यांचा मृत्यू नसून त्यांची हत्याच झाली असावी असा आरोप करीत या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन अॅड.मुकेशचे वडील देवनाथ रहागंडाले व आई पुष्पा रहागंडाले यांनी आज शनिवारला(दि.27)गोंदियाचे पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांना दिले.त्यांच्यासोबत राष्ट्रीय क्षत्रिय पोवार महासभा महासचिव मुरलीधर टेंभरे,पवार युवक संघटना नागपूरचे अध्यक्ष प्रदिप कोल्हे,महासचिव रमेश टेंभरे,कोषाध्यक्ष पृथ्वीराज रहागंडाले, गोंदिया जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,पवार प्रगतीशील मंचचे प्रा.संजिव रहागंडाले,सडक अर्जुनी पोवार संघटनेचे लिलेश रहागंडाले यांच्यासह सडक अर्जुनी व गोंदिया जिल्हा पोवार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणने एैकून निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन देत दिलेल्या निवेदनाची दखल घेण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात देवनाथ रहागंडाले व पुष्पा रहागंडाले यांनी आमचा मुलगा अ‍ॅड मुकेश हा गेल्या सहा सात वर्षापासून साकोली हे गाव सोडून सडक अर्जूनी येथे वास्तव्यास होता.मुलाने नागपूरातील मेघा या मुलीशी आंतरजातीय विवाह केला.त्या विवाहाला आमचा विरोध होता.म्हणून त्याने आमच्याकडे न राहता सडक अर्जुनी येथे राहणे सुरु केले.या दरम्यान मुलगा म्हणून आमच्याशी कधी कधी संपर्कात राहायचा.तो आजारी आहे अशी कुठलीही माहिती आम्हाला दिली गेली नाही.उलट मंगळवारच्या (दि.२३) रात्री आमची सून अ‍ॅड मेघा रहागंडालेचा भाऊने रात्री ११ वाजेच्या सुमारास तुमचा मुलगा मरण पावला असे सांगून फोन बंद केला.आम्ही वारंवार फोन करुन काय झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.परंतु काहीच कळेना जेव्हा सकाळी आम्ही सडक अर्जुनीला पोचलो तेव्हा तुमच्या मुलाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे सागंण्यात आले.पण जेव्हा आम्ही मुलाच्या जवळ बघितले तर त्याने विषप्राशन केल्याचे चिन्ह कुठेच दिसून येत नव्हते.त्यामुळे आम्हाला शंका निर्माण झाली आणि डुग्गीपार पोलीसात तक्रार नोंदवून शवविच्छेदनाची मागणी केली.जेव्हा की आमच्या सुनेने विषप्राशन करुन मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर शवविच्छेदनाची तयारी आधीच करायला हवी होती,ती न करण्यामागे काय कारणे होती ही भूमिका संशयास्पद वाटत आहे.त्यातच शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतरही योग्यप्रकारे शवविच्छेदन झाले नसावे असे आम्हाला वाटत असून शवविच्छेदन अहवालही व्यवस्थित निष्पक्ष येईल की नाही याबाबत शंका असल्याची भूमिका पोलीस अधिक्षकासमोर मांडत असताना मृतकाची आई पुष्पा रहागंडालेंना अश्रू अनावर झाले होते.
मुलाला दोन मुली असून वडील आजारी असल्याची माहिती त्यांना होती का त्या त्या रात्री घरी का नव्हत्या कुणाघरी होत्या याची सुध्दा चौकशी करुन त्या दिवसाचा मुकेशच्या मोबाईलसह सुनेच्या मोबाईल काॅलची सुध्दा तपासणी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.अंत्येष्ठीनंतर सुनेचे वडील चरणसिंह मथुरिया हे आमच्या साकोली येथील निवासस्थानी येऊन तेरवीच्या कार्यक्रमाची विचारणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची माझे चांगले संबध आहेत असे म्हणने आम्हाला कुठेतरी शंकास्पद वाटत असल्याने आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असावी अशी भिती आम्हाला असून आमच्या नातवांच्याही जिवाला धोका असल्याने निष्पक्ष चौकशी करुन आमच्या मुलाच्या आत्माल्या न्याय मिळवून देण्याची विनंती वडील,आई ,बहिणीसह जावयाने केली.
निवेदनात सोमवार (दि.२२) च्या सायंकाळी ५ वाजेपासून ते मंगळवार(दि.२४) सकाळी ९ वाजेपर्यंतच्या सर्व मुलगा,सून यांच्या सर्व मोबाईल कालॅचे डिटेल्स,लोकेशन कुणाकुणासोबत बोलणे झाले याचाही तपास पोलीसांनी करावा अशी मागणी केली आहे.आमचा मुलगा साधा स्वभावाचा होता त्याचे कुणाशीही वाद नव्हते परंतु अचानक असे काय झाले की आमचा मुलाचा मृत्यू झाला.मुलगा आजारी सुध्दा नव्हता जर सडक अर्जुनीवरुन उपचारासाठी भंडारा येथे नेले जात असताना साकोली हे गाव असताना आम्हाला का सांगण्यात आले नाही असे अनेक प्रश्न निवदेनात उपस्थित केले आहे.सोबतच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सकांची सुध्दा याप्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
राष्ट्रीय क्षत्रिय पोवार महासभेचे महासचिव मुरलीधर टेंभरे यांनी येत्या 2 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरात भेटून या सर्व प्रकरणाचे निवेदन नागपूरातील सर्व पोवार संघटनांचे पदाधिकारी देणार असल्याचेही कळविले आहे.