आर्थिक नियोजनशून्यतेने शेतकरी आत्महत्यांत वाढ – पी. साईनाथ
पाकचा खरा चेहरा जगासमोर आणणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्धार
वृत्तसंस्था,नवी दिल्ली,दि.19- पठाणकोट हल्लानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला कसे उत्तर देता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारला दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची रणनिती आखण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघासमोर उरी हल्ल्याचा मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.
उरी हल्ल्याबाबत आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग, गृह सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव उपस्थित होते. कालपासूनची ही सर्वात उच्चस्तरीय बैठक आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल, आयबी आणि रॉचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा आंतराष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर उजेडात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर आवश्यक्ता पडली तर याचे पुरावेही सादर केले जातील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहे. दहशतवाद्यांकडून जीपीएस ट्रॅकर सापडले आहे. ज्याचा स्ट्राटिंग पाईंट पाकिस्तान आहे. या शिवाय त्यांच्याकडे पाक सैन्याचे चिन्ह असलेले हत्यारं मिळाली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात जा : सुप्रीम कोर्ट
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील चौथा सुपूत्र शहीद
विशेष प्रतिनिधी यवतमाळ,berartimes.com दि. १९ – बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या वाढली असून १८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळमधील विकास जनार्दन कुळमेथे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. या हल्ल्यात काल एकूण १७ जवान शहीद झाले, त्यापैकी ३ जवान महाराष्ट्रातील होते. तर विकास जनार्दन कुळमेथे हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान आज त्यांचे निधन झाले. ते यवतमाळमधील वनी तालुक्यातील नेरडचे रहिवासी होते. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भाडीपार गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
सालेकसा : तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे भाडीपार गावासह संपूर्ण परिसरात एक दहशत पसरली आहे. तसेच या अज्ञात आजाराचा प्रकोप एवढ्या वेगाने वाढत चालला आहे. की आज गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना गोंंदियाच्या केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य चमू गावात दाखल झाली असून प्रत्येकाचे रक्त नमूने घेऊन औषधोपचार करीत आहे. आतापर्यंत या आजाराबद्दल नेमकी माहिती स्पष्ट झाली नसून हा आजार डेंग्यू आजार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डेंग्यू जीवघेणा आजार असल्यामुळे सर्वत्र एकच दहशत पसरली आहे.
भाडीपार हे गाव वाघनदीच्या काठावर आहे. तालुक्यात चार दिवसापूर्वीच अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीचा फटका भाडीपार गावाला सुद्धा बसला. गावात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.
दुग्ध व्यवसायात धवल क्रांती घडवू-रामलाल चौधरी
भंडारा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे. दुग्ध व्यवसायाने यशोगाथा निर्माण केली आहे. अशा या व्यवसायाची दुग्ध संघाच्या माध्यमातून धवल क्रांती घडवू असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी यांनी व्यक्त केले.
शहरातील मंगलम सभागृहात भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, जयंत वैरागडे, नामदेव सेलोकर, श्रीकृष्ण पडोळे, मुरलीमनोहर खंडेलवाल, माधव बांते, रामराव कारेमोरे, यादवराव कापगते, मारोती मस्के, दुलीचंद बिसने, सुमित हेडा, प्रणय झंवर, प्रशांत देशकर, गौतम बन्सोड, एन.डी. बोरकर, दुधराम भुरले, छाया पटले, संचालक सदाशिव वलथरे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, रामनारायण गाजीमवार, विनायक बुरडे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता येळणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी चौधरी यांनी दुग्ध संघाचे प्रतिनिधी व दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे संघ प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संघाला भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीकडे नेण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. सभेचे संचालन व आभार संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले. सभेला संघाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्रातील वृक्षारोपणाची लिम्का बुकमध्ये नोंद
उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद
न्यायासाठी सर्वपक्षीय ओबीसींनी एकत्र यावे-प्राचार्य तायवाडे
-८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर ओबीसी मोर्चा
-२७ नोव्हेंबरला नागपूरात ओबीसी महिला मेळावा
नागपूर दि. १९: समाजातील सर्वात मोठा घटक ओबीसी असतानाही, सरकारने ओबीसींवर अन्यायच केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पुन्हा ओबीसींची शक्ती एकवटली आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय व्हावे, अशी मागणी सर्वस्तरावरून होत असल्याने या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनावर ओबीसींचा भव्य मोर्चा ८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. ओबीसींच्या न्यायासाठी सर्वपक्षात असलेल्या ओबीसी आघाडीच्या प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन ओबीसींसाठी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले.
ते येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ स्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्याथ्र्यांच्या बैठकीत रविवारी बोलत होते.
प्राचार्य तायवाडे म्हणाले की, ७ ऑगस्टला पार पडलेल्या ओबीसी महाअधिवेशनाची दखल राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली आहे. महाअधिवेशनाच्या यशानंतरच ओबीसी क्रिमिलीअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांना स्वत: पुढाकार घेऊन काढावे लागले आहे. तर केंद्रामध्ये क्रिमिलीअरच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. असे असले तरी आमच्यावर लादलेली असंवैधानिक क्रिमिलीअरची अट कायमची रद्द करण्यात यावी, ही मुळ मागणी असल्याचे म्हणाले. ओबीसींच्या विकासासाठी केंद्र व राज्यात ओबीसी मंत्रालयाची नितांत गरज आहे. तर केंद्र सरकार देत असलेले ओबीसी शिष्यवूत्तीची शंभर टक्के रक्कम विद्याथ्र्यांना देण्यात यावे. तसेच ५० टक्के कपात करणाèया अधिकाèयांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. सोबतच येत्या २७ नोव्हेंबरला संविधान दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
बैठकीला पूर्व विदर्भातून महासंघाचे व वेगवेगळ्या आघाडींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात सचिन राजूरकर, शरद वानखेडे, बबलू कटरे, गुणेश्वर आरीकर, डॉ. एम.जी. राऊत, मनोज चव्हाण, महेंद्र निंबार्ते, गोपाल सेलोकर, भूषण दडवे, खेमेंद्र कटरे, अजय तुमसरे, डॉ. छाया दुरुगकर, निकेश पिने, प्रमोद मुन, विनोद उल्लीपवार, डॉ. छाया दुग्रकर, वैशाली बोकडे, कृष्णा देवासे, डॉ. गजानन धांडे, खुशाल बावणे, प्रा.रमेश पिसे, वैशाली काळे, अनिता ठेंगळी, डी.डी. पटले, प्रा. अमीत मांढरे, माजी आमदार सुदर्शन निमकर, गोविंद वरवाडे, पांडूरंग काकडे, उज्वला महल्ले, शामल चन्ने, राकेश रोकडे, निलेश कोडे, रोशन कुंभलकर, सुरेखा रडके, विनोद हजारे, राजेश ठाकरे, प्राचार्य टाले, प्रा.मस्के, संजय भिलकर, पन्नालाल राजपूत, अरविंद जायस्वाल, सूर्यकांत जायस्वाल, रमेश कोलते, प्रदीप कोल्हे, नाना लोखंडे, विजय तपाटकर आqदनी आपले विचार व्यक्त केले. तसेच मोर्चा अधिकाधिक व्यापक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका, विदर्भस्तरीय महिला मेळावा व विद्याथ्र्यांचे अधिवेशन याच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. अभियात्रिकीमधील अॅरोनॉटिकल इंंजि.च्या ओबीसी विद्याथ्र्यांना नाकारण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये संघटन तयार करण्यासंदर्भात चर्चा करुन नागपुरातील प्रत्येक समाज भवनात ओबीसी महासंघाची बैठक आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.