33.2 C
Gondiā
Tuesday, May 20, 2025
Home Blog Page 5695

सरकारचे धोरण डाॅक्टरविरोधी- आयएमएचा आंदोलनाचा इशारा

0

वृत्तसंस्था
जळगाव(berartimes.com), दि. २१ : डॉक्टर व रुग्णालयांबाबत सरकार वेगवेगळे कायदे करून डॉक्टरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य रुग्णांच्या कायम सेवेत असणाऱ्या लहान-लहान रुग्णालयांनाच फटका बसत आहे. यामुळे वैद्यकीय सेवा आणखी महाग होऊन रुग्णांना त्यांची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने हे धोरण थांबवावे अन्यथा या विरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या पत्रपरिषदेत आज रविवारला देण्यात आला.

आयएमएचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. समारोपानंतर पत्रपरिषद घेऊन अधिवेशनात झालेल्या निर्णयांबाबत माहिती देण्यात आली. त्या वेळी हा इशारा देण्यात आला.या पत्रपरिषदेस आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आढाव, उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. वर्षा ढवळे, अविनाश घोळवे, जळगाव शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव विलास भोळे उपस्थित होते.

सरकारकडून वैद्यकीय सेवेला अधिक वेठीस धरले जात आहे. भारतात वैद्यकीय सेवेत ८० टक्के खाजगी तर केवळ २० टक्के वाटा सरकारचा आहे. इतकेच नव्हे आरोग्यासाठीची तरतूदही तोकडी आहे. त्यात सरकार वेगवेगळे कायदे करून छोटे-छोटे रुग्णालय बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. एक प्रकारे सरकार खाजगी मॉल, खाजगी उद्योगांप्रणाणे येथेही खाजगीकरण राबवून मोठमोठ्या हॉस्पिटला चालना देत आहे. यामुळे लहान रुग्णालय बंद पडून वैद्यकीय सेवा आणखी महाग होऊ शकते, अशी शक्यता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केली.

या सोबतच रुग्णालयांच्या फायर सेफ्टीबाबतही त्रास दिल्या जात असल्याने या विरोधात राज्यभरात आम्ही माहिती घेऊन सरकारला विचार करायला लावणार आहे. तसेच या विषयी सरकारने धोरण निश्चित करावे, असे, राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. तसा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मेडिकलचे सर्व प्रवेश यापुढे फक्त ‘नीट’नेच

0

मुंबई, दि. २१ : वर्ष २०१७-१८ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशातील आंग्लवैद्यक आणि दंतवैद्यक या विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या एकाच सामायिक प्रवेश परीक्षेने दिले जाणार आहेत. याला महाराष्ट्र सरकारनेही आज मंजूरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नीटच्या गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यार्थी आपल्या पसंतीच्या कॉलेजचे पर्याय देऊ शकतात. पुढीलवर्षीपासून या पद्धतीने प्रवेश होणार आहे.

एकप्रकारे राज्यातील शिक्षणसम्राटांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. यावर्षीपासून नीटच्या गुणवत्तेनुसार राज्यात सामूहिक प्रवेश प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारने सामूहिक प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे.

गोरेगाव दुष्कर्म प्रकरण मे हो सीआय़डी जाॅंच

0

गोंदिया(बेरारटाईम्स)-गोरेगांव पुलीस थाने में हत्या के आरोप मे पुलीस कस्टडी मे सो रही महिला के साथ दुष्कर्म करने वाले आरोपी पुलीस कर्मचारी ज्ञानीराम जीभकाटे के खिलाप गुन्हा दाखल कर। इस मामले की विस्तृत जांच सीआयडी से करवाने की मांग गोंदिया सामाजिक संघनाओने आज रविवार को पुलीस अधिक्षक के नाम उपविभागीय पुलीस अधिकारी दिपाली खन्ना को दिये निवेदन मे किया है।
शहर के विभिन्न सामाजिक संगठनों के प्रतिनिधि की बैठक आज विश्रामगृह मे ली गई उसमे चर्चा कर निवेदन देने का निर्णय लिया गया। निवेदन मे दुष्कर्मी पुलिसकर्मी पर FIR क्यों दर्ज नहीं की गई,यह घटना 9 अगस्त की रात की है फिर इतने महत्वपूर्ण एवं सवेंदनशील घटना को इतने दिनों तक क्यों छुपाया गया,दुष्कर्म के तत्काल बाद पीड़ित महिला की मेडिकल जांच करवाई गई है,फौजदार जीभकाटे इससे पहले भी लैंगिक शोषण के मामले में निलंबित हो चुका है। ऐसे विवादास्पद व्यक्ति को थाने की ड्यूटी क्यों लगाई गई,जब महिला सिपाही श्रीमती मंजूसा घरडे बक्कल नंबर 1661 तथा तथा महिला शिपाई बक्कल नंबर 1676 आरोपी महिला की सुरक्षा में तैनात थी। तब वह विवादास्पद पुलिसकर्मी किस तरह दरवाजा खोल कर आरोपी महिला की कोठरी में जाकर उसके साथ दुष्कर्म करने की कोशिश की?,गोरेगांव थाने के थानेदार को जब तक पूरे मामले की निष्पक्ष जांच ना हो जाये तब तक निलंबित किया जाए। एवं दोषी पाए जाने पर उस पर फौजदारी कार्रवाई की जाए। यह मामला अत्यंत महत्वपूर्ण व संवेदनशील हैं। अतः इसकी निष्पक्ष एवं उच्चस्तरीय जांच के लिए मामला CID के सुपुर्द किया जाए उल्लेख किया गया। निवेदन देतेसमय पुजा तिवारी,अशोक सक्सेना,निलेश देशभ्रतार,संजीव जैन,योगेश अग्रवाल एंव अन्य सदस्य मौजुद थे।

आंदोलनाला युवा स्वाभिमानचा पाठिंबा; भीक मांगो आंदोलन करणार

0

गोंदिया,दि.२१(बेरारटाईम्स) -जिल्हा सामान्य कुवर तिलकqसह रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या विविध समस्यांना घेऊन गेल्या १४ ऑगस्ट पासून सुरू असलेल्या वसंत ठाकूर यांच्या आंदोलनाला आज रविवारला युवा स्वाभिमान संघटनेने पाqठबा जाहीर केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष जितेश राणे,वाय.पी.येळे,टोनेश हरिणखेडे,विनोद गौतम,मनोज बिसेन,अरqवद टेंभरे,भरत शरणागत,राजेंद्र पटले,जीवनलाल कुकडे,जगदीश रहागंडाले,कमल राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.गेल्या ७ दिवसापासून हे आंदोलन सुरू असून उद्या २२ ऑगस्टपासून युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने शहरात भीक मांगो आंदोलन करून गोळा झालेली रक्कम आरोग्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी बेरार टाईम्सला दिली.
गेल्या सात दिवसापासून गोंदिया शहरातील कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन सामाजिक कार्यकर्ता बसंत ठाकूर यांनी बेमुदत आंदोलनाला सुरवात केली आहे.ठाकूर यांनी आपल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी स्वतः व आंदोलनाला बसलेल्या कार्यकत्र्यासह मुंडण करून शासनाच्या व आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदविला.१४ ऑगस्टपासून सुरू या आंदोलनाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे सहकारी म्हणून मुकेश शिवहरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाèयानी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाqठबा दिला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पातुरकर व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.अजय केवलिया यांनीही त्यांच्या मागण्या आरोग्य विभागाकडे पोचवून त्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले परंतु जोपर्यंत आरोग्य मंत्री स्वतः रुग्णालयातील समस्या सोडविण्यासंबधीचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ठाकूर यांनी घेतला आहे.आता त्यांच्या आंदोलनाला युवा स्वाभिमान संघटनेने सुद्धा पाqठबा दिला आहे.

खासदार, आमदाराच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

0

साकोली,दि.21 : गेल्या पाच दिवसांपासून १६ तास भारनियमनाच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला खासदार नाना पटोले व आमदार राजेश काशीवार यांनी भेट देवून उद्यापासून १२ तासांचे भारनियमन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.

दरम्यान आज शेतकऱ्यांनी शासनाच्या व भारनियमनाच्या विरोधात नारेबाजी करीत साकोली व सेंदुरवाफा या गावातून शासनाची अंत्ययात्रा मोर्चा काढला.१६ तासाचे भारनियमन करून शेतकऱ्यांना संपवण्याचा भाजपाचे हे कटकारस्थान आहे असा आरोप करण्यात आला होता.मोर्च्यानंतर खासदार, आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली.

मागील दोन महिन्यापासून शेतकरी भारनियमन बंद व्हावे यासाठी धावपळ करीत आहेत. विज वितरण कार्यालयासमोर १६ पासून १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे, यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आंदोलनात अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरीभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, रामदास कापगते, बाबुराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे, यशवंत ब्राम्हणकर, मारोती कापगते हे शेतकरी पाचव्या दिवशीही आमरण उपोषणाला बसले होते.

वनविभागाच्या तळ्याचे जलपूजन

0

गोरेगाव : तालुक्यातील नोनीटोला शेतशिवारातील चिल्हाटी वनपरिक्षेत्रात यावर्षी जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत पडीक जमिनीमध्ये तयार केलेल्या तळ्यातील संकलित जलाचे पूजन तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पं.स.सभापती दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव, क्षेत्रसहायक आग्रे, वनरक्षक बिसेन, वनरक्षक उदापुरे व वनमजूर उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने पावसाळी पाण्याचे जतन करून शेतशिवार व गावशिवारात पाण्याचा साठा वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत गोरेगाव वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांनी चिल्हाटी वनक्षेत्राची निवड करून तेथील २५ हेक्टर जमिनीवर ३५ मिटर अंतराने अनेक नाल्या खोदून बांध टाकल्याने क्षेत्रात आज मोठय़ा प्रमाणात पाण्याचा संचय दिसून येत आहे. जमिनीच्या खालच्या बाजूला ३५मिटर बाय ३५मिटर बाय ३५मिटर खोलीचे तळे बनवून मोठय़ा प्रमाणात पाणी संचयीत करण्यात आले. या पाण्याचा उपयोग क्षेत्रातील शेतीसाठी व जंगल प्राण्याची तहान भागवण्यासाठी नक्कीच होणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार कार्यक्रम शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार आहे.

नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ४६ पदे रिक्त

0

नागपूर,दि.21- विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढतो मात्र आरटीओतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरलीच जात नाही. परिणामी, कामाची गती मंदावते. याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसतो. सद्यस्थितीत नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अशा विचित्र कात्रीत सापडले आहे.सर्वात जास्त महसूल गोळा करणाऱ्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात ४६ पदे रिक्त आहेत. कार्यालयात ११९ पदे मंजूर असताना केवळ ७३ पदे भरण्यात आली आहेत. विशेषत: सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तीन पदे, मोटार वाहन निरीक्षकाचे सात तर सहायक मोटार वाहन निरीक्षकाची १० पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाने या कार्यालयासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या १० वाढीव पदांना मंजुरी दिली होती, परंतु महिना होत नाही तोच नऊ पदे कमी केली. परिणामी, कामाचा ताण वाढला असून प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मनोहरभार्इंचे काम प्रेरणादायी

0

गोंदिया : मनोहरभाई पटेल यांनी दर्शविलेल्या मार्गांचे अनुकरण करून आम्ही सामाजीक कार्य करायला हवे. त्यांनी शिक्षण क्षेत्र व जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी केले.

भारतीय नवयुवत छात्रोत्थान संस्थेच्यावतीने मनोहरभाई पटेल स्मृती दिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते गुरूवारी (दि.१८) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिहरभाई पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून दूरसंचार विभागाचे मुख्य प्रबंधक अरवींद पाटील, एमआयडीसी अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, अनिल गौतम, जलील खान पठाण, संस्था सचिव अशोक सहारे उपस्थित होते. याप्रसंगी पाहु्ण्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या व संस्थेच्या कार्याची प्रशंसा करीत आपली श्रद्धांजली अर्पित केली.
कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या न मिनल बेलगे, द्वितीय सिया धनेंद्र ठाकूर, तेजस्वीनी बंदनवार, तृतीय सोहन अनिल मेंढे, विभा ठाकरे, रियासिंग राठोड, शितल पवनलाल टेंभरे तर रितीका डोहरे, किरण गुंडेवार, नेहा पेंढारकर, स्नेहा चौबे, निलेश चौरे, निधी सयाम यांनी प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्यावतीने सर्जन भगत यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, नागझिरा व्याघ्रप्रकल्प वनसरंक्षक आर.एस. गोवेकर, सामाजीक वनीकरण उपसंचालक बडगे, अश्वीन ठक्कर, यु.टी.बिसेन, एन.एच.शेंडे व अन्य उपस्थित होते. संचालन रवी मुंदडा यांनी केले. आभार महेश करियार यांनी मानले.कार्यक्रमासाठी अ‍ॅड. अनिता शर्मा, महेश शर्मा, अभिजीत सहारे, आशा ठाकूर, गुड्डू बिसेन, मनिष कापसे, शैलेश जायस्वाल आदिंनी सहकार्य केले.

नगर पंचायतचा उपक्रम : कचराकुंडी व घंटागाडीचे लोकार्पण

0

तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांक

शहर स्वच्छतेसाठी घेतला पुढाकार

गोरेगाव,दि.21 : शहराला स्वच्छ व निरोगी ठेवण्याच्या उद्देशातून नगर पंचायतने पुढाकार घेत शहरात कचराकुंडी व घंटागाडीची व्यवस्था केली आहे. स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून शहरात १00 कचराकुंडी व ८ घंटागाड्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष सीमा कटरे,उपाध्यक्ष आशिष बारेवार,बांधकाम सभापती टेभुर्णकीकर, नगरसेवक मलेश्याम येरोला,रुस्तम येळे,चन्ने, यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आज प्रत्येकच शहरात कचर्‍याची समस्या स्थानिक प्रशासनासाठी डोकेदुखीची ठरत आहे. यापासून सुटका व्हावी व शहर स्वच्छ तसेच सुंदर रहावे यासाठी नगर परिषदेने शहरात कचराकुंडी व घंटागाडी उपक्रम राबविण्याचे ठरविले.
या कचराकुंड्यांमुळे कचरा इतरत्र फेकण्याच्या प्रकारावर आळा बसणार आहे. तसेच एकत्र झालेला कचरा जवळील ग्राम हलबीटोला येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाठविला जाणार आहे.
यासाठी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे कार्य नगर पंचायतकडून केले जात आहे. कचराकुंडी व घंटागाडीच्या या उपक्रमाला काही शहरवासीयांनी विरोध दर्शविला होता. मात्र यावर उपाध्यक्ष व आरोग्य सभापती आशिष बारेवार यांनी टोल फ्री क्रमांकाचा तोडगा काढला आहे. यातंर्गत कचराकुंड्यांतील कचरा नियमीत उचलला जाणार आहे. मात्र यात खंड पडल्यास शहरवासीयांना त्याबाबत नगर पंचायतच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. यासाठी कुचराकुंड्यांना क्रमांक दिले जाणार असून त्यावर नगर पंचायतचा टोल फ्री क्रमांकही नोंदविला जाणार आहे.

विदर्भ राज्यासाठी बीआरएसपीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

चंद्रपूर,दि.21 : स्वतंत्र विदर्भाची मागणी ही फार जुनी असून स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. एवढेच नव्हे तर विदर्भातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असून महाराष्ट्र सरकारच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा परिणाम आहे. जोपर्यंत विदर्भ स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत विदर्भातील शेतकरी कामगार सुखी होणार नाही त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अहमद कादर यांनी मोर्चाला संबोधित करताना केले.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य व अन्य मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर जिल्हा बीआरएसपीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला बीआरएसपीचे जिल्हा प्रभारी राजू झोडे यांनीही मार्गदर्शन केले.