32.3 C
Gondiā
Sunday, May 18, 2025
Home Blog Page 6500

कोण होणार आमदार?

0

गोंदिया- उद्या १५ ऑक्टोबर रोजी होणा-या तेराव्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३८ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने ५४ उमेदवार कायम आहेत. यात सर्वाधिक १९ उमेदवार हे गोंदिया विधानसभा मतदार संघात असून सर्वांत कमी ८ उमेदवार हे आमगाव विधानसभा मतदार संघात आहेत. नामांकन मागे घेण्याच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांतील बंडोबांना थंडोबा करण्यात पक्षांच्या नेत्यांना यश आले असले तरी काही बंडखोर हे पक्षाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

-: अर्जुनी मोरगाव विधानसभा:-
श्रीमती किरण कांबळे (शिवसेना)
राजेश नंदागवळी (भारतीय नॅशनल काँग्रेस)
राजकुमार बडोले (भाजप)
मनोहर चंद्रीकापूरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
डॉ.भीमराव मेश्राम (बसप)
धनपाल रामटेके (भारिप बहुजन महासंघ)
अजय लांजेवार (अपक्ष)
प्रमोद गजभिये (अपक्ष)
जगन गडपाल (अपक्ष)
रत्नदीप दहिवले (अपक्ष)
दिलवर्त रामटेके (अपक्ष)
इंजि.दिलीपकुमार वालदे (अपक्ष)
महेश शेन्डे (अपक्ष)

-:तिरोडा विधानसभा:-
परसराम कटरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
श्रीमती राजलक्ष्मी तुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
पंचम बिसेन (शिवसेना)
विजय रहांगडाले (भाजप)
दीपक हिरापुरे (बसप)
अब्दूल कादीर शेख (मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी), वीरेंद्रकुमार जायस्वाल (पिझन्ट्स एन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया),
अविनाश नेवारे (अपक्ष)
प्रताप पटले (अपक्ष)
दिलीप बनसोड (अपक्ष)
राजकुमार बोहने (अपक्ष)
मनोहर पटले (अपक्ष)
श्रावण रहांगडाले (अपक्ष)

-:गोंदिया विधानसभा:-
गोपालदास अग्रवाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
विनोदकुमार अग्रवाल (भाजप)
अशोक गुप्ता (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
श्रीमती करुणा गणवीर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजकुमार कुथे (शिवसेना)
योगेश बनसोड (बहुजन समाज पार्टी)
गोपाल उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी)
विनोदकुमार नंदुरकर (आंबेडकराईट्स पार्टी ऑफ इंडिया), चिंधूजी उके (अपक्ष)
संतोष उमरे (अपक्ष)
सुरेशकुमार चौरागडे (अपक्ष)
छैलबिहारी अग्रवाल (अपक्ष)
धमेन्द्र गजभिये (अपक्ष)
नारायण पटले (अपक्ष)
दिगंबर पाचे (अपक्ष)
नामदेव बोरकर (अपक्ष)
लक्ष्मण मेश्राम (अपक्ष)
मंगल मस्करे (अपक्ष)
इंजि.राजू ठकरेले (अपक्ष)

-:आमगाव विधानसभा:-
मूलचंद गावराने (शिवसेना)
रमेश ताराम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
संजय पुराम (भाजप)
रामरतनबापू राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
श्रीमती शारदा उईके (बसप)
केशवकुमार भोयर (अपक्ष)
सहेसराम कोरोटे (अपक्ष)
संतोष नाहाके (अपक्ष)

आत्मसमर्पित नक्षलवादी बजावणार मतदानाचा हक्क

0

नागपूर – सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाèया विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी २५ आत्मसमर्पित नक्षल्यांना भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र उपलब्ध करून दिले आहे. यात ४ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६२ आत्मसमर्पित नक्षल्यांनी मतदान केले होते.
राज्यात येत्या १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान होत आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असा फतवा नक्षल्यांनी काढल्यानंतर त्यांच्याच एकेकाळच्या सहका-यांनी नक्षल्यांना घरचा आहेर दिला आहे. बंदुकीच्या बळावर सशस्त्र क्रांतीची भाषा करणा-या आणि भारतीय राजसत्तेला आव्हान देणा-या नक्षल्यांना लोकशाहीचे महत्त्व कळले आहे. १५ – २० वर्षे नक्षल चळवळीत काम केल्यानंतर या चळवळीचा फोलपणा दलम सदस्यांच्या लक्षात आला आहे. राजसत्तेचे केवळ दिवास्वप्न दाखवून बंदूक आणि हिंसेच्या बळावर सामान्य आदिवासींची हत्या करण्यालाच या चळवळीने प्राधान्य दिले आहे. विचारहीन असलेल्या या चळवळीत होणारी कुचंबना, आरो१⁄२याच्या समस्या, सदैव भटकंती, अंतर्गत घुसमट आणि कायम मृत्युचे भय यामुळे मोठ्या संख्येने नक्षलवादी दलम सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
एकीकडे आत्मसमर्पित नक्षलवादी लोकशाहीवर विेशास दाखवून मतदानात भाग घेत असताना सामान्य नागरिकांनीही नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

कर्तव्यशून्य भाजपनेता जि.प.च्या जलसंधारण समिती सदस्यपदी कसा?

0

गोंदिया– कधीही साधी प्रभागातील निवडणूक लढण्याची qहमत केली नाही. कंत्राटदारीच्या माध्यमातून मात्र पक्षाच्या नावाखाली प्रचंड माया गोळा केली. असे असताना जे कार्यकर्ते आपल्या श्रमाच्या जोरावर जनतेतून निवडून आले, त्यांच्यावर हुकमत गाजवीत भाजप म्हणजे काय, हे त्याच लोकप्रतिनिधींना हिनवत समजावण्याचा प्रयत्न करणाèया व्यक्तीला भाजपने जलसंधारण समितीच्या सदस्यपदी घेतले. जर अशा कर्तव्यशून्य आणि आयत्या पीठावर रेघा ओढणाèयांना काडीचाही संबंध नसताना महत्त्वाच्या पदावर घेण्यात येत असेल, तर कार्यकत्र्यांची गरजच काय? असा सवाल आता पक्ष कार्यकत्र्यांनी पक्षश्रेष्ठींच्या पुढ्यात उभा केला आहे.
ग्रामीण विकासाची नाळ म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असून या संस्थेवर निवडून येणारे सदस्य विकासाचा आराखडा तयार करतात. या जिल्हा परिषदेत सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. अशीही ही सत्ता गेल्या अडीचवर्षापूर्वी निव्वळ एका सभापतीच्या कारणामुळे विविध कारणांनी चर्चेत आली होती. मात्र, यात इतर पदाधिकारी व सदस्यही विनाकारण गोवले गेले होते. त्यानंतरही भाजपच्याच हातात सत्ता असून नव्याने गठित झालेल्या जलसंधारण विभागाच्या समितीवर दोन अशासकीय सदस्य नेमावयाचे असतात.
त्यामध्ये गोंदियातील एका भाजपच्या महामंत्र्याला संधी देण्यात आली. त्या महामंत्र्याचा तसा त्या यंत्रणेशी काडीमात्र संबंध येत नसला तरी वीटभट्टी आणि रेतीच्या व्यवसायासोबतच ठेकेदारी करण्याचा अनुभव प्रगाढ असा आहे. अशा नामी कंत्राटदार व्यक्तीला जलसंधारण समितीवर का नेमण्यात आले? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
असे असले तरी तीच व्यक्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत मात्र गोंदिया मतदारसंघातील पोवार, कुणबी जिल्हा परिषद सदस्यांवर पाळत ठेवण्याचे काम करीत होती. ज्या पुनाटोला भागात या महोदयाचे वास्तव्य आहे, त्या भागातून ते महोदय कधी निवडून आले ते सोडा, त्यांनी कधीही निवडणूक लढविलीच नाही. परंतु, ज्यांनी निवडणूक लढवून जिल्हा परिषद व नगरपरिषदेत पोचले त्यांनाच भाजप काय आहे, हे सांगायला चालल्याने त्या महोदयाविरुद्ध चांगलेच वातावरण तापले आहे.
विशेष करून भाजपचे कधी महामंत्रीपद तर कधी दुसरे पद घेऊन निवडणुकीत येणारा भाजपचा पैसा आपल्या हातात कसा राहील, आणि तो वाटप करताना ग्रामीण व शहरी भागातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ता त्याला सलाम कसा ठोकेल, म्हणजे आपण मोठे असल्याचे दिसेल याच तोèयात वावरणाèया व्यक्तीला निव्वळ भाजपचा पदाधिकारी म्हणून जलसंधारण समितीत ठेवण्यात आले. पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांना आता तरी आपण आपल्या यंत्रणेत कुठल्या व्यक्तीला समितीवर नेमून ग्रामीण भागातील चांगल्या अभ्यासू तज्ज्ञावर अन्याय तर केला नाही ना, हा विचार करण्याची वेळ आली आहे.

कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

0

गोंदिया : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था र्मयादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.
सडक/अर्जुनी तालुक्याच्या प्राथमिक शाळा खजरी येथे कार्यरत अशोक नवनाथ राख या शिक्षकांची जून २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदली झाली. त्या शिक्षकाला मोकळे करण्यासाठी संस्थानचे व बँकाचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जून २०१४ मध्ये या शिक्षकावर ४लाख ३२ हजार १९५ रुपये घेणे बाकी होते. परंतु सत्ताधारी संचालकाच्या मर्जीतील तो शिक्षक असल्यामुळे कोहमारा शाखेच्या लेटर पॅडवर कर्ज नसल्याचे खोटे प्रमाणपत्र सडक/अर्जुनी पंचायत समितीला देण्यात आले. त्या अर्जावर तारीख नाही जावक क्र. नाही तरी ही हे पत्र देण्यात आले.ते पत्र खरे की खोटे याची शहानिशा न करता खंडविकास अधिकारी यांनी जि.प.परभणीला सदर शिक्षकाला जाण्यासाठी मोकळे केले.

ओबीसी मतदार ठरविणार आमदार

0

गोंदिया- गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला क्षेत्र आहे. या मतदार संघातील बहुसंख्य असलेल्या पोवार ,कुणबी,कलार,लोधी,मरार ,मळी
समाजातील नेत्यांनी भाजप असो वा राष्ट्रवादी वा काँग्रेस या पक्षात नेहमीच निष्ठेने कार्य केले. नेहमी द-या उचलणा-या या नेत्यांना पक्षाने चांगलेच राबवून घेतले. असे असले तरी या नेत्यांनी कधीही कुरबूर केली नाही. केवळ एकवेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद वगळता पोवार समजाला
ला या पक्षांनी फार काही दिले नाही. तुकडे दाखवून नेहमी या समाजाची बोळवण करण्याचे कार्य नेहमी होत गेले. तरीही या समाजातील नेत्यांनी कधीही हाराकिरी केली नाही. यामुळे यावेळी तरी हे राजकीय पक्ष या समाजाच्या सन्मानाला ठेच पोचविणार नाहीत, अशी अपेक्षा समाजातील मतदार बाळगून होते,परंतु त्ङ्मांच्ङ्मा त्ङ्मा अपेक्षेलाही काही वाव ‘िमळाला नाही.कलार समजातील सुरेश चौरागडेंनाही आपल्ङ्मा अस्तित्वासाठी रिंगणात उतरावे लागले आहे. पक्षप्रमखांनी गेल्ङ्मा अनेक वर्षापासून ङ्माठिकाणी भाजप राष्ट्रवादीकडून आम्हाला उमदवारी मळेल ङ्मा आशेत असलेल्ङ्मांच्ङ्मा आशेवरही पाणी ङ्केरले ङ्मामळे गोंदिङ्मा मतदारसंघ भाजप राष्ट्रवादीवर चांगलाच नाराज दिसून ङ्मेत असून पोवार , कुणबी,कलार,मळी,मरार,लोधी समजातील मतदार ङ्मा निवडणुकीत काङ्म निर्णाङ्मक भूमका घेतात त्ङ्माकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
obc-matdar
भाजपने तर १९६२ पासून पोवार ,कुणबी,मरार,मळी,लोधी समजाला कधी विधानसभेत जाण्ङ्माची संधी दिली हे त्ङ्माच पक्षातील मठ मठ्या वावड्या उठविणाङ्र्मानी सांगितल्ङ्मास जनतेलाही कळेल.मधल्ङ्मा काळात शिवसेनेच्ङ्मा कोट्यात मतदारसंघ गेल्ङ्मानंतर कुठे कुणबी समजाला संधी मळाली.परंतु पोवार समज हा अद्यापही मगेच आहे.त्ङ्मातही पोवार समजानंतर मठ्या संख्ङ्मेने असलेला दलीत,कलार,लोधी,मरार समजही उपेक्षित राहिला आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यात सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. नेहमी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर असायचा. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपने तब्बल साडे सहा हजाराची आघाडी घेतली. या आघाडीमुळे भारतीय जनता पक्षात उत्साह संचारला होता पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवाराला संधी द्यावी, असा ठरावही गोंदिया ग्रामीण भाजपने घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली दावेदारी पुढे केली. या मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या ही पोवार समाजाची असून आजवरच्या इतिहासात कधीही कुठल्याही पक्षाने या समाजातीलच नव्हे तर कुणबी समजातील नेत्याला उमेदवारी दिलेली नाही. राष्ट्रवादीने तर नेहमच गोqवद शेंडे ङ्मांच्ङ्मावर अन्ङ्माङ्म केलेला आहे.
या मतदारसंघातच नव्हे जिल्ह्यातही पोवार समाजाने अद्यापही एकी दाखविली नाही. कारण या समाजातील विविध पक्षात विखुरलेल्या नेत्यांवर समाजाचा विश्वास देखील उरला नाही. हे वास्तव्य या समाजातील नेत्यांनाही विसरणे शक्य नाही.
पोवार समाजातील नेत्यांच्या हाती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दिली, म्हणजे खूप काही दिले असे राजकीय गणित बनले आहे. परंतु, त्या जिल्हाध्यक्षांची काय अवस्था आहे, हे त्यांनाच ठाऊक. या परिस्थितीचे राजकीय विश्लेषण करून आपली राजकीय शक्ती टिकवून ठेवण्यात हा समाज अपयशी ठरला आहे.
गोंदिया मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढविण्यासाठी प्रामुख्याने पोवार समाजातील उमेदवार समोर आले होते.तसेच कुणबी समजातूनही आले होते. ङ्मा दोन समजापैकी कुणा एकाला संबंधित पक्ष उमेदवारी देईल,असे चित्रही निर्मण झाले होते,मत्र ङ्मा समजाच्ङ्मा नेत्ङ्मांची तुती चाललीच नाही आणि राष्ट्रवादी व भाजपमधील कुणबी,पोवार,कलार,लोधी,मरार,मळी समजातील नेत्ङ्मांना इतरांचेच प्रचार करावे लागले त्ङ्मातही काही तथाकथीत काही ओबीसी
समजातील नाराज नेत्ङ्मावर नजर ठेऊन त्ङ्मांची जासुसी करुन पक्षाच्ङ्मा नेत्ङ्माकंडे आपण कसे चांगले चमच आहोत हे चांगले दाखविणारे राष्ट्रवादी,भाजपचे निष्ठावंत ठेकेदार बनल्ङ्माने ओबीसी समजातील नेत्ङ्मांचेच नव्हे काङ्र्मकत्ङ्र्मांचेही वाईट दिवस सुरु झाले आहेत.
दलीत समजावरही होत असलेला अन्ङ्माङ्म बघुन ङ्मावेळी बहुजन समज पक्षाने ङ्मोगेश बनसोड ङ्मांना रिंगणात उतरवले. बसपकडून लोधी समजाचे राजीव ठकरेले ङ्मांनी उमदवारी मगितली परंतु त्ङ्मांच्ङ्माही पदरी निराशा पडल्ङ्माने त्ङ्मांनी अपक्ष रिंगणात राहण्ङ्माचा निर्णङ्म घेत बसपशी बंडखोरी केली.
राष्ट्र‹वादीने कधीही गोंदिया भंडारा जिल्ह्यात पोवार समाजाला पुढे येऊ दिले नाही, हे वास्तव आहे. राष्ट्रवादी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा सतिश राऊत ङ्मांच्ङ्मा मध्ङ्मङ्कातून उमदवारी गोंदिङ्मातून दिली गेली होती.परंतु तो काळ ङ्मा पक्षाच्ङ्मा जन्मचाच होता त्ङ्मामळे त्ङ्मा उमदवाराचे काङ्म होणार हे सर्वांनाच ठाऊक होते.आम्ही प्रतिनिधीत्व दिले हे सांगून होत नसते.
भाजपने १९६२ पासून गोंदिङ्मा मतदारसंघात दिलेल्ङ्मा उमदवाराकडे बघितल्ङ्मास बहुसंख्ङ्मेने भाजपसोबत असलेला समज म्हणून ज्ङ्मा पोवार व कुणबी समजाला ओळखले जाते त्ङ्मा समजाला एकदाही संधी दिली गेली नाही,हे वास्तव्ङ्म भाजपमधील मतदार विसरतो की अन्ङ्माङ्माचा प्रतिकार करतो हे तर ङ्मेत्ङ्मा १९ आँ्नटोंबरच्ङ्मा निकालानंतरच कळणार आहे.
तिरोड्यात काँग्रेसचे पी.जी.कटरे, भाजपचे विजङ्म रहांगडाले आणि अपक्ष दिलीप बन्सोड ङ्मांच्ङ्मात रंगत दिसून ङ्मेत आहे. ङ्मा मतदार संघात पोवार समजाची मते विभाजण्ङ्माची श्नङ्मता असल्ङ्माने अपक्ष उमदवार दिलीप बन्सोड ङ्मांना लाभ होण्ङ्माची श्नङ्मता वर्तविली जात आहे. बसपने दिलेला छुपा पाqठबा आणि शिवसेनेचे पंचम बिसेन ङ्मांनी भाजपमध्ङ्मे मरलेली सेंध भाजपसाठी धोकादाङ्मक दिसून ङ्मेत आहे. ङ्मा परिस्थितीत काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. तर आमगाव मतदार संघात अखेरच्ङ्म दिवशी काँग्रेसचे उमदवार रामरतन राऊत हे मगे पडले असून राष्ट्रवादीचे रमश ताराम ङ्मांनी आघाडी घेतल्ङ्माने जिल्ह्ङ्मतील एकमव मतदार संघ राष्ट्रवादीकडे जातो की काङ्म? अशी परिस्थिती निर्मण झाली आहे. ङ्मा भाजपचे संजङ्म पुराम मगे पडले आहेत. अर्जुनी मरगाव मतदार संघात भाजपचे राजकुमर बडोले आणि शिवसेनेच्ङ्मा किरण कांबळे ङ्मांच्ङ्मातच खरी लढाई दिसून ङ्मेत आहे. काँग्रेसचे राजेश नंदागवळी ङ्मांना अपक्ष किती डॅमज करतात त्ङ्मावर त्ङ्मांची परिस्थिती अवलंबून राहणार आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

0

गोंदिया – राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून २८८ मतदारसंघांत बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह ४११९ उमेदवार रिंगणात आहेत.
यंदा प्रथमच पंचरंगी लढती होत असून उमेदवारांनी अखेरच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह कोकणात सभा, रॅली, रोड शो, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान नि:पक्षपाती व खुल्या वातावरणात होण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आहे. सोमवारचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष जीवाचे रान करत होते.
राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभांसह रोड शो, पदयात्रांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात आला. जाहीर प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचारावरच सर्वाचा भर असणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यात २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २३४ मतदारसंघ हे खुल्या प्रवर्गासाठी, २९ मतदारसंघ हे अनुसूचित जाती तर २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. २८८ जागांसाठी ४११९ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ३८४३ उमेदवार पुरूष तर २७६ महिला उमेदवार आहेत.
अकोला आणि गुहागर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार रिंगणात आहेत तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वात जास्त ३९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे सर्वात जास्त २८७, शिवसेनेचे २८२, भाजपचे २८०, राष्ट्रवादीचे २७८ आणि मनसेचे २१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ४ लाख ८४ हजार मतदार तर वडाळा हा सर्वात लहान मतदारसंघ असून त्यात १ लाख ९६ हजार मतदार आहेत.
दीड लाख मतदान यंत्रे
या निवडणुकीसाठी १ लाख ५१ हजार मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील ८ कोटी ३५ लाख ३८ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२३३१ मतदान केंद्रे संवेदनशील
मतदान मुक्त व निपक्षपाती होण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३२० कंपन्या, १ लाख २२ हजार पोलिस मतदानाच्या दिवशी तैनात केले आहेत. राज्यात २३३१ मतदान केंद्र ही संवेदनशील तर ६२६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. गडचिरोलीत सर्वात जास्त ४५० मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. मुंबईत ३४१, ठाणे ३९९, रायगड १९ आणि रत्नागिरी १ मतदान केंद्र संवेदनशील आहे.

मोरगावअर्जूनी विधानसभा निवृत्त अधिका-यांत रंगणार द्वंद

0

खेमेंद्र कटरे
गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या राखीव मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांसह प्रशासकीय अधिकाèयांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून एक, दोन तर नव्हे तब्बल तीन निवृत्त अधिकारी विविध पक्षाच्या माध्यमातून आमदारकीचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी ते निवडणुकीच्या समरभूमित पाय रोवून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
यापैकी तिघांची नोकरी ही गोंदिया जिल्ह्यात राहिली असून दोघांची तर जिल्हा परिषद गोंदियातत गेली. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यापैकी दोन उमेदवारांची नोकरीतील कारर्कीद ही नोकरभरतीतील गैरव्यवहाराला घेऊनच चांगलीच गाजली होती, हे येथे विशेष.
आपल्या राजकीय दबावासोबतच अधिकारी संघटनेच्या माध्यमातूनच नव्हे तर आर्थिक पातळीवर सुद्धा त्या नोकरभरतीतील गैरव्यवहाराला लपविण्यासाठी बरेच काही आटापिटा केला होता, हे जनतेला ठाऊक आहे. त्या अधिकाèयांमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले मनोहर चंद्रिकापुरे आणि जिल्हा आरो१⁄२य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ.भीमराव मेश्राम यांचा नामोल्लेख होतो. हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
विद्यमान आमदार इंजि.राजकुमार बडोले हे दुसèयांदा भाजपकडून रिंगणात आहेत. बडोले हे गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात शाखा अभियंता म्हणून नोकरीला होते. त्यांनी २००९ मध्ये राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. यावेळी मात्र जे इतर उमेदवार आहेत ते सेवानिवृत्त झाल्यानंतर रिंगणात उतरले आहेत. यामध्ये डॉ. भीमराव मेश्राम हे बहुजन समाज पक्षाकडून, मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून रिंगणात उतरले आहेत. या चौघांपैकी राजकीय अनुभवाचा विचार केल्यास बडोले शिवाय कुणाकडेही राजकारणाचा अनुभव नाही.
परंतु, मनोहर चंद्रिकापुरे यांचे बंधू लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्यामुळे त्यांना थोडा अनुभव आहे, तो कामात येतो काय याकडे लक्ष लागले असून या चार अधिकाèयांपैकी कोण यावेळी अजुμ्र्रनीमोरगाव मतदारसंघातून आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडतो, याकडे लक्ष लागले आहे.
डॉ.मेश्राम हे स्थानिक तालुकावासी असल्याने त्यांना कितपत लाभ मिळतो.आणि मनोहर चंद्रिकापुरे यांना सेवानिवत्तीनंतर केलेल्या शेतकरी हितपयोगी कामाचा लाभ किती मिळतो याकडे लक्ष लागले आहे.आहेत. हे या मतदारसंघातील मतदारांना सुद्धा ठाऊक आहे.

आघाडी-युतीत बिनसल्याने उमेदवारांच्या चिता वाढल्या

0

देवरी-आमगाव विधानसभेची निवडणूक होणार चौरंगी

नागपूरचे बिल्डरही निवडणुकीच्या रिंगणात

देवरी-विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजते न् वाजते, तशी देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघातील प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना स्फुरण चढल्याचे येथील मतदारांनी अनुभवले होते. कोणाला मोदींच्या नामाचा तर कोणाला आपण केलेल्या कामाचा अभिमान होता. आपणच आमदार होणार, या तोèयात सर्व संभाव्य उमेदवार वावरत होते. राज्यात युती-आघाडीचे काही जमत नसताना सुद्धा या उमेदवारांनी शेवट पर्यंत आशा सोडली नव्हती. एकमेकांचे उणेदुणे काढायला सुरवात झाली होती.
शेवटी व्हायचे तेच झाले. राज्यात स्वबळाची वल्गना सर्वच राजकीय पक्षांनी केली आणि देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या जणू तोंडचे पाणीच पळाले. परिणामी, आपण हमखास निवडून येणार याची शाश्वती एकालाही नसल्याने आणि चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाल्याने उमेदवारांसह कार्यकत्र्यांची दमछाक होताना दिसत आहे. दरम्यान, नागपूरचे बिल्डर ही या मतदारसंघातून आपले भा१⁄२य अजमावीत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी करिष्मा केला आणि भाजपला त्यांच्या कल्पनेपलीकडील यशप्राप्ती झाली. याचा प्रभाव आजही भाजपच्या नेत्यांवर आहे. त्यातून आमगाव विधानसभा मतदार संघही सुटू शकला नाही. आमदार होण्याची १०० टक्के खात्री वाटू लागल्याने प्रत्येकाला आमदारकीचे स्वप्न पडू लागले. त्यामुळे राज्यात सत्तेची स्वप्ने पाहणाèया भाजपत मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले रमेश ताराम यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांनाच तिकीट फायनल होणार, अशी आशा भाजपतील एका मोठ्या गटातील कार्यकत्र्यांची होती. दुसरीकडे, संघनेत्यांनी युवा आणि अभ्यासू तसेच प्रभावी नेतृत्व गुण असल्याचे सांगत संजय पुराम या युवा नेत्यासाठी फिल्डिंग लावली. याचवेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे दाखवत मुख्य व्यवसायाने बिल्डर म्हणून ओळखले जाणारे आणि स्वतःला पक्षनिष्ठ म्हणवून घेणारे सहसराम कोरोटे यांनी ‘एकला चलो रेङ्क च्या धर्तीवर या क्षेत्रात आपला संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून त्यांनी गेल्या एकदोन वर्षापासून नाटक आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून देणगी देण्याचा सपाटा चालविला असल्याचे बोलले जाते. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
एकंदर कोरेटी हे नागपूर येथील बिल्डर असून त्यांनी आमदारकीच्या हव्यासापोटी या क्षेत्रात आपले पाय रोवण्याची तयारी चालविल्याचा आरोपही त्यांचे विरोधक करतात. लक्ष्मीदर्शनाच्या लोभाने त्यांच्या भोवती असलेला गोतावळा हा खिसे गरम असे पर्यंतच गळा काढणार असल्याचाही मतप्रवाह आहे. व्यवसायाने बिल्डर असलेले कोरेटी हे अतिमहत्त्वाकांक्षी असल्याने व त्यांना पक्षापेक्षा स्वतःच्या विकासाचीच qचता अधिक असल्याने पक्षाने त्यांना त्यांची जागा दाखविल्याचे भाजप वर्तुळात चर्चिले जात आहे.
लक्ष्मीच्या जोरावर निवडणूक qजकू पाहणारे कोरेटी हे खरोखरच्या या भागातील जनतेशी इमान राखतील काय? असा प्रश्न मतदारांना पडला आहे. एकीकडे भाजपमध्ये तिकिटासाठी गुद्दमगुद्दी असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसपक्षात विद्यमान आमदारांना स्पर्धा करू शकेल, असा तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने रामरतन राऊत हे बिनधास्त होते. इतर पक्षांनी ही निवडणूक तेवढी गांभीर्याने घेतली नसल्याने सर्वच बेसावध होते. कोणीही स्वपक्षाची या क्षेत्रात मार्केqटग करीत नव्हता. शेवटी स्वबळाची घोषणा झाली आणि सर्वांची पळापळ सुरू झाली. उमेदवार शोधूनही सापडेना. मिळेल त्याला ‘बाqशग बांधाङ्क, अशी अवस्था बिगर भाजप-काँग्रेसवाल्यांनी झाली. शेवटी ‘धरा, बांधा आणि उभे कराङ्क, तंत्राचा वापर झाला. काँग्रेस आणि भाजप सोडले तर इतर पक्षाचे उमेदवार बिनधास्त आहेत. कारण त्यांच्यापेक्षा त्यांना उभे करणाèयांचीच इभ्रत वेशीवर आहे.
या मतदार संघात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण केले जात आहे. विद्यमान आमदार रामरतन राऊत, भाजपचे संजय पुराम, राष्ट्रवादीचे रमेश ताराम, अपक्ष सहसराम कोरेटी यांनी सद्यपरिस्थितीत प्रचारात आघाडी घेतली आहे. तुलनेने या मतदारसंघात शिवसेना अत्यंत दुबळी वाटत आहे. संघटन वाढीचे येथील नेत्यांनी कधीही प्रयत्न न करता आपण कसे मोठे होणार, यावर भर दिल्याचे हे फलित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बेसावध असलेल्या नेत्यांवर ‘उमेदवार होता का भाऊङ्क, म्हणण्याची पाळी आली. आजही शिवसेनेचे नेते हे पक्षाच्या भल्यासाठी कार्य करतील, याचा मतदारांना विश्वास वाटत नसल्याने राज्यातील प्रमुख पक्ष असलेली सेना या मतदार संघातून जवळपास बाद झाल्यात जमा आहे. तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होती. आघाडी तर तोडली, पण आमगावातून कोणाला लढविणार, हा खरा प्रश्न होता. ऐनवेळी कसेबसे तासाभरात भाजपने नाकारलेले रमेश ताराम यांनी राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आले. असे असले तरी रमेश ताराम यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
भाजपमधील दुखावलेला बहुजन समाज हा रमेश तारामांवर मेहरबान होण्याची शक्यता आहे. तसेही ताराम यांच्यापेक्षा खरी खुन्नस आहे, ती राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी यांनाच. कारण विद्यमान आमदार रामरतन राऊत यांच्यामुळे माहेश्वरी हे आमदार होता होता राहिले. त्यामुळे ही निवडणूक ताराम यांच्यापेक्षा माहेश्वरी यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीचे क्रमांक दोनचे नेते प्रफुल पटेल यांच्यासाठीही ताराम यांचा विजय महत्त्वाचा आहे.
बसपचा हत्ती या निवडणुकीत केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसरीकडे रामरतन राऊत हे आपल्या विकास कामांच्या भरवशावर विजयाची आशा लावून आहेत. परंतु, स्वपक्षात त्यांची लोकप्रियता मात्र बरीच घटली आहे. आमदार झाल्यानंतर त्यांनी पोसलेला गोतावळा त्यांच्या पराभवाचे कारण तर होणार नाही ना, अशी qचतेची लकेर त्यांच्या चेहèयावर स्पष्ट जाणवते. आपण केलेल्या विकास कामांचे न केलेले मार्केqटग आणि चौकडीवर दाखविलेला फाजील आत्मविश्वास त्यांना कोठपर्यंत तारतो, हे निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. सद्यःस्थितीत सर्वच उमेदवार हे निवडणूक सोपी नसल्याचे उदारमनाने खासगीत कबूल करीत आहेत.

समजवादी पार्टीचे नारायण पटलेंना समर्थन

0

गोंदिङ्मा-गोंदिङ्मा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमदवार नाराङ्मण पटेल ङ्मांना समजवादी पक्षाच्ङ्मावतीने समर्थन देण्ङ्मात आल्ङ्माची महिती पक्षाचे जिल्हाध्ङ्मक्ष प्रदिप(बाबा)दुबे ङ्मांनी दिली आहे.काँग्रेसपक्षाने आघाडीकरतांना दगाबाजी केल्ङ्माचा आरोप करीत राज्ङ्म काङ्र्मकारीणीने गोंदिङ्मा मतदारसंघात पटले ङ्मांना समर्थन देण्ङ्माचा निर्णङ्म घेण्ङ्मात आल्ङ्माचे म्हटले आहे.

ग्रामीण मतदारांच्या प्रेमाने भारावले अग्रवाल

0

गोंदिया : शहरात ‘तदारांच्ङ्मा भेटीसाठी ग्रा‘ीण भागातील आपल्ङ्मा पदङ्मात्रा आटोपून ‘ंगळवारी काँग्रेसचे उ‘ेदवार गोपालदास अग्रवाल ङ्मांनी सिव्हील लाईन स्थित हनु‘न ‘ंदिरात पूजा-अर्चना करुन पदङ्मात्रेला शुभारंभ केला. दिवसभरच्या कामामुळे गावकरी थकून गेलेले असणार, असा विचार करीत आ.गोपालदास अग्रवाल चारगावात पोहोचतात, पण प्रत्यक्षात तेथील वातावरण पाहून चांगलेच भारावून जातात. आपली आतुरतेने वाट पाहात असलेले लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व गावकरी आणि त्यांचे प्रेम पाहून गदगद झालेले आ.अग्रवाल त्यांची आस्थेने विचारपूस करतात. काळजी करू नका, आम्ही तुमच्याच सोबत आहोत, तुमच्याशिवाय आमच्या समस्या दूर करणारा कोण आहे? असे म्हणून गावकरीही त्यांना तेवढङ्माच आत्मियतेने दिलासा देतात.
गेल्या काही दिवसांपासून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव पिंजून काढणारे गोपालदासजी सांगतात, हे वातावरण आणि असे प्रसंग माझ्यासाठी नवीन नाही. प्रत्येक गावात आपले असेच प्रेमपूर्वक स्वागत केले जाते.
प्रत्येक गावातील बारीकसारिक समस्येची मला जाणीव आहे. त्यामुळेच कोणत्या समस्या कधी सोडवायच्या याचे प्लॅनिंग माझ्याजवळ आहे. माझ्या या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास हीच माझी ताकद आहे.
गावकèयांसमोर बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, गोंदियातील माझ्यासारख्या एका आमदारामुळे निर्माण झालेले आव्हान पेलण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना गोंदियात यावे लागले, यावरूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू किती सरकली आहे, हे लक्षात येते. पण मोदी काय किंवा इतर कोणीही नेता नेता आला तरी काही फरक पडणार नाही. मोदींनी या भागातील धान उत्पादक शेतकèङ्मांच्या तोंडाला पाने पुसली आहे.
धानाच्या पट्याातील शेतकèयांसाठी काय करणार हे मोदी सांगू शकले नाही, ते धान उत्पादकांच्या व्यथा काय दूर करणार? असा सवाल यावेळी अग्रवाल यांनी प्रचारसभेत बोलताना उपस्थित केला. शहरात निघालेल्ङ्मा पदत्राातेत पृथ्वीपालqसह गुलाटी, अशोक चौधरी, रवि हल‘ारे, अनिल शहारे, आलोक ‘ोहंती, प्रङ्कुल अग्रवाल, विजङ्म सावंत, शकील ‘ंसुरी, अशोक लंजे, अनिल गौत‘, देवेंद्र अग्रवाल ङ्मांच्ङ्मासह ‘ोठ्या संख्ङ्मेने काँग्रेसचे नेते व काङ्र्मकर्ते उपस्थित होते.