बेलवाडीत रंगले तुकाराम महाराज पालखीचे पहिले गोल रिंगण

0
6

पुणे- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण आज (गुरुवार) बेलवाडीतील मैदानावर पार पडले. हा अलौकिक सोहळा बघण्यासाठी लाखो वारकरी उपस्थित होते. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गजर, माऊली नामाचा जयघोष, प्रचंड उत्साही वातावरण आणि आकाशात जमलेली ढगांची गर्दी यावेळी बघायला मिळाली. त्यात पालखी रिंगणाने एक वेगळीच झळाळी आणली. त्याने वैष्णव सुखावला. वारीचा पहिला उद्देश सफल झाला. अश्वाच्या पायाची धूळ कपाळावर लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला होता.
बारामती तालुक्यातील काटेवाडीत काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे रिंगण पार पडले. तुकोबांचे दर्शन घेतल्याने वर्षभर मेढ्यांचा कळप रोगराईमुक्त राहतो असा स्थानिक मेंढपाळांचा विश्वास आहे. सणसर मुक्काली आलेल्या वारकऱ्यांना ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम भाविकांनी शिरखुर्मा देऊन पाहुणचारही दिला.