औरंगाबाद: औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात दहावीचा पेपर शिक्षकांनीच फोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्यू हायस्कूलमधील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आज दहावीचा बीजगणिताचा पेपर होता. शिक्षकांनी 11 वाजता पेपर देणं अपेक्षित होतं. पण शिक्षकांनी पेपर सुरू होण्याआधीच 10 वाजता प्रश्नपत्रिका बाहेर काढली.
धक्कादायक बाब म्हणजे ही गोष्ट समजल्यावर बोर्डाचं पथक घटनास्थळी पोहोचलं, तेव्हा विद्यार्थ्यांना पुरवलं जाणारं क़ॉपीचं साहित्यही तिथेच पडलं होतं. कार्बन पेपर, गाईडमधील काही भाग असं सर्व साहित्य अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे.