‘पंतप्रधानांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही’

0
7

वृत्तसंस्था
अमेठी – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, कॅनडा, चीन, मंगोलिया, जर्मनी या विविध देशांत जातात, पण त्यांच्याकडे देशातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी आजपासून (सोमवार) आपला मतदारसंघ असलेल्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘सतत परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांच्या घरी कधी आले नाहीत. मोदी सरकारने शेतकऱ्यांकडून फूड पार्क हिसकावून घेतले. फूड पार्कमध्ये भाजपने सूडाचे राजकारण आणले. केंद्रातील सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. अमेठीमध्ये फूड पार्क झाल्यास अमेठीबरोबरच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही फायदा होणार होता.‘‘