एकाच कुटुंबातील ६ जणांची आत्महत्या

0
6

अमरावती,दि.28- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी २ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये ४ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे.आत्महत्या करणाऱ्यांमध्ये प्रफुल नारायण चव्हाण (वय ४८), विवेक नारायण चव्हाण (वय ४०), लक्ष्मी नारायण चव्हाण (वय ५०), मंगला नारायण चव्हाण (वय ५२), कामिनी बारड (वय २९) व रोशनी बारड (वय २६) यांचा समावेश आहे. या सर्वांनी विष प्रश्न करून आत्महत्या केल्याच्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रफुल नारायण चव्हाण यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या सर्वांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.