बदल्या होऊन मुख्यालयातच तळ

0
8

गोंदिया,दि. १ -राज्यसरकारच्या धोरणानुसार मे महिन्यात जिल्हा परिषदेतंर्गत विविध विभागाच्या प्रशासकीय व विनंत्या बदल्या करण्यात आल्या.त्यानुसार काही बदली पात्र कर्मचारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू सुद्दा झाले.परंतु बदल्यानंतर ३ महिन्यांचा काळ लोटल्यानंतरही बहुतांश कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच ठाण मांडून बसले आहेत.ते बदली झालेले कर्मचारी येथेच ठाण मांडून बसल्याने यांच्याशिवाय जिल्हा परिषदेचा कारभार चालणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.मुख्यालयातील कर्मचारी मुख्यालयाबाहेर जायला तयार होत नसतील तर देवरी,अर्जुनीमोर,सालेकसा सारख्या नक्षलग्रस्त भागात नोकरी करणाèयांनी कायम तिथेच राहावे काय अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ लागल्याने या बदल्यांच्या बाबतीतही अन्यायग्रस्त कर्मचारी आपल्या भावनांचा स्पोट घडवून आणण्याची शक्यता नाही.