वीज पडून एक मृत, चार गंभीर

0
12

आमगाव ,दि. १ -शेळ्या चारत असताना मुसळधार पावसात वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१) रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान आमगाव तालुक्यातील नवतलाव कुंभारटोली येथे घडली. यात पाच शेळ्या दगावल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवतलाव परिसरात काही गुराखी शेळ्या चार असताना अचानक मुसळधार पावसाचे आगमन झाले. या दरम्यान विजेचा कडकडाट होऊन वीज पडली. यात दुर्गेश शंकर मेंढे (वय १८) रा. गणेशपूर या गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. तर धनराज राजाराम शिवणकर (वय ४५), संतोष तुकाराम मेश्राम (वय ३०), विलास पुरुषोत्तम शिवनकर (वय १८) सर्व रा. भवभूतीनगर, मनिष विनोद रहिले (वय १३) रा. शाहूनगर जखमी झाले. याशिवाय पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांच्या मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले व मृतकासह जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.