छायाचित्राची पाहणी करताना डॉ. सुब्बाराव म्हणाले, जलसंधारणाचे लहान लहान प्रकल्प अत्यंत आवश्यक आहेत. या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढवून ही योजना माझी आहे व माझ्यासाठी आहे, अशी भावना निर्माण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय एकात्मता व बंधूभावाची शिकवण सेवाग्राम येथून महात्मा गांधी यांनी दिली असून जगामध्ये विविधता असलेला भारत हा एकमेव देश आहे. विसावे शतक हे पाश्चिमात्य देशाचे होते. तेथे भारताला स्थान नव्हते, परंतु एकविसावे शतक हे भारताचे आहे. कारण महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित हे शतक असल्यामुळे संपूर्ण जग भारताकडून अपेक्षा करीत आहे.
जिल्ह्यातील महत्वपूर्ण निम्न वर्धा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आढावा, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सेवाग्राम भेट, अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्न धान्य योजनेपासून विविध योजनाचा शुभारंभ उद्योग, शिक्षण, शेती, जलसंपदा आदी विविध विभागाच्या योजनाच्या शुभारंभाच्या प्रसंगीची छायाचित्रे प्रदर्शनीमध्ये आकर्षकपणे सादर करण्यात आले आहे.