सौर चरख्यातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार रोजगार – सुधीर मुनगंटीवार

0
15

वर्धा : वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना सौर ऊर्जेवरील चरख्याच्या माध्यमातून रोजगार मिळवा, कुटुंबांना आर्थिक मिळकतीचे साधन मिळावे या उद्देशाने या जिल्ह्यात सौर ऊर्जेवरील चरखे सीएसआर फंडातून देण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवाग्राम आश्रमात सकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापू कुटीमध्ये प्रार्थना करुन सूतकताई करुन महात्मा गांधीजींचे स्मरण केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंवत मठकर, सचिव श्रीराम जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, तहसीलदार राहुल सारंग, शिरीष गोडे यांची उपस्थिती होती.