६३ धान खरेदी केंद्रांना मान्यता

0
11

गोंदिया,दि.१६ : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०१५-१६ च्या रब्बी हंगामासाठी धानाच्या आधारभूत किंमती जाहीर करण्यात आल्या आहे. आधारभूत किंमतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान विकण्याची वेळ येऊ नये म्हणून रब्बी हंगाम (उन्हाळी) धान खरेदीकरीता ४१ आणि आदिवासी क्षेत्रात २२ अशा एकूण ६३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मंजूरी प्रदान केली आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेमार्फत खरेदी होणाऱ्या ४१ खरेदी केंद्राची यादी तालुका निहाय पुढील प्रमाणे आहे. गोंदिया तालुका – कटंगीकला, रावणवाडी, काटी, दासगाव, अदासी, कामठा, मजितपूर, टेमणी, कोचेवाही, नवेगाव/धापेवाडा, आसोली. गोरेगाव तालुका- गोरेगाव, दवडीपार, मोहगाव/तिल्ली, कुऱ्हाडी, तेढा. अर्जुनी/मोर तालुका- अर्जुनी मोरगाव (वि.का.), अर्जुनी मोरगाव (रा.मि.) अर्जुनी मोरगाव (ख.वि.), नवेगावबांध, भिवखिडकी. आमगाव तालुका- आमगाव, गोरठा. सालेकसा तालुका- सालेकसा (रा.मि.). तिरोडा तालुका- पांजरा, चिरेखनी, तिरोडा, नवेझरी, विहिरगाव, मुंडीकोटा, चिखली, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, मेंढा. सडक अर्जुनी तालुका- सौंदड, पांढरी, ब्राम्हणी, मुरपार, हेटी, धानोरी. तर आदिवासी विकास महामंडळ यांचेमार्फत खालील धान खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची खरेदी होणार आहे. देवरी तालुका- डवकी, पुराडा, लोहारा/दे., अंभोरा, चिचेवाडा, चिचगड, सावली. सालेकसा तालुका- सालेकसा, बिजेपार, साकरीटोला, मक्काटोला, पिपरीया. अर्जुनी मोरगाव तालुका- गोठणगाव, केशोरी, इळदा, बाराभाटी, धाबे/पवनी, पांढरवाणी. सडक अर्जुनी तालुका- केनरी, चिखली, खजरी, डोंगरगाव अशा एकूण ६३ धान खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे.
या सर्व धान खरेदी केंद्रावर साधारण धान १४१०/- रुपये प्रती क्विंटल व ‘अङ्क दर्जाच्या धानाकरीता १४५०/- रुपये प्रती क्विंटल, अधिक २००/- रुपये प्रोत्साहन पर राशि असे दर निश्चित करण्यात आले आहे. धान खरेदी केंद्रावर केवळ एफ.ए.क्यू. दर्जाचेच धानाची खरेदी करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा सोबत आणावा. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड या हंगामात केली आहे अशाच शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात येईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ओळखपत्र सोबत आणावे व स्वत: केंद्रावर धान विक्रीकरीता आणावा. असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.सवाई यांनी कळविले आहे.