वर्धा – जिल्ह्यातील आगरगाव (ता. देवळी) येथे दगडाच्या खाणीतील पाण्यात बुडून 2 मुलींचा रविवारी मृत्यू झाला. या तीनही मुली नजिकच्याच बेड्यावर राहत होत्या. अंजली भोसले (वय 18), रोहणी चव्हान वय (वय 18) आणि तोरना चव्हान (वय 12) अशी मृतांची नावे आहेत.
कपडे धुण्यास गेल्या होत्या
> बेड्यावरून पाच मुली कपडे धुण्यासाठी खदानीच्या साचलेल्या पाण्यात उतरल्या.
> त्यापैकी अचानक एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली.
> दरम्यान, तिला वाचवण्यास गेलेल्या इतर दोन मुलांचाही अंत झाला.