गोंदियातील अतिक्रमण शहराला लागलेला काळा डाग-खासदार पटोले

0
17

गोंदिया, दि.27=शहर हे माझे जन्मस्थळ आहे,त्यामुळे सुरवातीपासूनच गोंदिया शहराचे सौदर्यीकरण व्हावे यासाठी खासदार झाल्यापासून मी काम करीत आहे.परंतु काही लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन दुकाने थाटल्यानेच नव्हे तर रस्त्यावर दुकानातील साहित्य ठेवून रस्ता अडविणाèयामुळे गोंदिया शहर हे कलqकत झालेले आहे.ज्या लोकांनी रस्ते,नाल्यावर अतिक्रमण केले आहे,त्यांनी आपले अतिक्रमण स्वतःच हटवून परिषदेच्या मोहिमेला सहकार्य करायला हवे अशी प्रतिक्रिया खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.

शहराच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी जेव्हा केव्हा प्रयत्न केले तेव्हा नगरपरिषद क्षेत्रातील अतिक्रमण व इतर बाबीच अडचणीच्या ठरल्या,उलट रेल्वेच्या परिसरात झपाट्याने विकासाची कामे सुरु झाली आहेत.शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना अतिक्रमणधारकापासून होणाèया त्रासामुळे गोंदियाचे नाव जनमानसात वाईट होत चालले आहे,त्यामुळे दुकानदारांनीच आपल्या शहराच्या नावाचे लौकीक टिकवून ठेवण्यासोबत प्रशासनाने जे बेरोजगार अतिक्रमणधारक आहेत,त्यांच्यासाठी कुठेतरी पर्यायी व्यवस्था सुध्दा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे पटोले यांनी सांगितले.त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यातच झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पत्रकारावर काही अतिक्रमणधारकांनी हल्ला केला ही निंदनीय घटना आहे. त्या सर्वांना कडक शिक्षा कायद्यानुसार मिळेल. कुठल्याही पोलीस अधिकाèयाला अतिक्रमणहटाव मोहिमेतील प्रकरणात कारवाई करु नका किंवा या पोलिस अधिकार्याला हटविण्यासाठी कुणालाही बोललो नाही.तरीही माझ्यानावाने कुणी गैरप्रचार करीत असेल तर त्यास मी काहीच करु शकत नाही.परंतु लोंकानी अतिक्रमण हटाव मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे मग ते कुठल्याही मोठ्या नेत्याचेच काय लहान व्यापाèयाचेही असले तरी अतिक्रमण हटणे महत्वाचे आहे.

अतिक्रमण हटाव मोहिम माझ्या घरापासूनच सुरु करा-दादरीवाल
गोंदिया शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम ही एकदा काटेकोरपणे राबविणे गरजेचे आहे.ही मोहीम राबविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून माझ्या घरापासूनच प्रशासनाने आधी अतिकॅ्रमण असल्यास मोहीमेची सुरवात करावी माझे पुर्ण सहकार्य राहणार असल्याची ग्वाही माजी नगरसेवक दिनेश दादरीवाल यांनी दिले.सोबतच अस्थायी अतिक्रमण जे असतात त्यांना हटविण्यासाठी प्रशासनाकडून कुठलेही नोटीस देणे कायदेशीर बंधनकारक नसल्याचेही सांगितले.

अतिक्रमण हटाव मोहिमेत जनतेसोबत-नगरसेवक अग्रवाल
शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत आपल्या वार्डातीलच नव्हे तर शहरातील जनतेची जी भूमिका आहे,त्या भूमिकेसोबतच आपण असल्याची ग्वाही नगरसेवक धर्मेश(बेबी)अग्रवाल यांनी व्यक्त केली.

संपूर्ण गोन्दिया जिल्हा अतिक्रमण मुक्त करावा. सर्वत्र कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. जनतेच्या हितासाठी शासनाने सोडलेली जागा जनतेच्या उपयोगासाठी असावी तेव्हा ‘सबका साथ सबका विकास ‘ होईल. शासन सर्व जनतेच्या हितासाठी रस्त्याच्या बाजूला जागा सोडते, अनेक ठिकाणी सार्वजनिक ऊपयोग करण्यासाठी जागा सोडलेली असते.त्या जागा अतिक्रमण मुक्त असाव्यात. सर्व अतिक्रमण काढण्याप्रसंगी कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. जगदीश शर्मा ,आमगाव