भिष्णुर येथे आगीत २० घरे खाक

0
16

वर्धा,दि.27- जिल्ह्यातील  आष्टी तालुक्यातील भिष्णुर या गावात आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने 25 २५ घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. हि आग पसरत गेल्याने बाजूच्या घरांनी पेट घेतला यात पाच बकर्याही भाजल्याने मृत पावल्या.आगीचे रुप बघून स्थानिक नागरिकांनी आर्वी, वर्धा, पुलगाव, देवळी येथील अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले.गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. देवळी व आर्वी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तसेच आर्वी नगरपालिकेतून टॅंकर घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळविले.या घटनेत २५ राहते घरे संपुर्ण जळून खाक झाले. गृहोपयोगी वस्तु, वर्ष भराचे धान्य, तुर, सोयाबीन, चना, कापूस, जनावरांचा चारा सर्व काही या अग्नि तांडवाने जळून खाक झाले.