अवगुणांचे दहन हाच खरा विजय- प्रा. बक्षी

0
29

गोंदिया दि.२४: माणसाने दुस-यातील अवगुणांकडे बोट न दखविता आपल्यातील अवगुणांचा शोध घ्यावा आणि त्यांचे दहन करावे, आपल्या अवगुणांचे दहन करणे हाच खरा विजय आहे. विजयादशमी चा भावार्थ असाच आहे असे प्रतिपादन निवृत्त प्रा.जगदीशचन्द्र बक्षी यांनी केले व सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
विदर्भ साहित्य संघ गोंदिया द्वारा 22 ऑक्टोबर रोजी सायं.विनायकराव कोतवाल स्मृति सभागृहात आयोजित विजयादशमी स्नेहमिलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रा.बक्षी बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ गोंदियाचे अघ्यक्ष यशवंत सरुरकर होते.या प्रसंगी कवी प्रा.धनराज ओक, चैतन्य मातुरकर व कुमार कोक णे यांनी समयोचित कविता वाचन केले.
प्रारंभी सचिव प्रदीप व्यवहारे, सहसचिव उदय राजनकर,कोषाधक्ष प्रकाश उमालकर, अजय जोशी यांनी पुष्पगुछाने सर्व अतीथींचे स्वागत केले.संचालन सहसचिव संजय निसल व
आभार माणिक गेडाम यांनी मानले. शेवटी एकमेकांना शमीपत्राची देवघेव करून शुभेच्छासह कार्यक्रमचा समारोप करण्यात आला.