राज्य पुरस्कृत वनपाल अकबर खाँ पठाण अपघातात ठार

0
9

व़़डसा, दि.१३: देसाईगंज(वडसा0 येथील वनविभागात कार्यरत राज्यपुरस्कृत वनपाल अकबरखाँ पठाण यांचे काल(ता.१२)रात्री अपघातात निधन झाले.अकबरखाँ पठाण हे देसाईगंज येथील वनोपज नाक्यावर कार्यरत होते. काल रात्री कर्तव्य आटोपून ते घराकडे परत जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना नागपूरला नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. श्री.पठाण हे कोंढाळा येथे कार्यरत असताना २००८ मध्ये संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत त्यांनी कोंढाळा गावाला आदर्श गाव केले. याबद्दल शासनाने कोंढाळा गावाला संतु तुकाराम वनग्राम पुरस्काराने व अकबरखॉ पठाण यांना सुवर्णपदकाने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.