ग्रामज्योती योजनेचा २५ कोटींचा आराखडा मंजूर

0
14

भंडारा : केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे. या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांना नियमित वीज पुरवठा, अकृषक ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, वितरण बळकटीकरण व वृद्धीकरण, तांत्रिक व व्यावसायिक वीज हानी कमी करणे, या बाबींसाठी २५.५ कोटीरूपयांच्या पायाभूत विकासआराखड्यास जिल्हा विद्युत समितीने मंजुरी दिली आहे.
खा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालीजिल्हा विद्युत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ.अँड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी उपस्थित होते

या योजनेंतर्गत गावठाण फीडर विलगीकरणासाठीचार वाहिन्या प्रास्तावित असून त्यासाठी ५.२६ कोटी रूपये, वितरण व्यवस्थेसाठी २४९ किलोमीटरच्या उच्चदाब वाहिन्या, ६१.४८ किलोमीटरच्या लघुदाब वाहिन्या, आणि १00 के.व्ही.ए.चे ६५ नवीन रोहित्रांसाठी १७.४८ कोटी रूपयांची तरतूद, दारिद्रय रेषेखालील ३,७६५ कुटुंबाना वीज जोडणीसाठी २.४ कोटी रूपये, सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी २७ लाख रूपयांची तरतूद याआराखड्यात करण्यात आली आहे.